advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास

15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास

Independence day 2021 : दिवसाऐवजी 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का देण्यात आलं माहिती आहे का?

01
15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

advertisement
02
पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठरवलं असतं तर 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. भारताचे शेवटचे ब्रिटिश वॉईसरॉय माऊंटबेटन यांनी ठरवलं असतं तर भारताचा स्वातंत्र्यदिन 30 जून असता.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठरवलं असतं तर 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. भारताचे शेवटचे ब्रिटिश वॉईसरॉय माऊंटबेटन यांनी ठरवलं असतं तर भारताचा स्वातंत्र्यदिन 30 जून असता.

advertisement
03
काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.

काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.

advertisement
04
1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली होती आणि राजकीय संकटही होतं. 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपलं सरकार बनलं तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि लेबर पार्टीचं सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.

1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली होती आणि राजकीय संकटही होतं. 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपलं सरकार बनलं तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि लेबर पार्टीचं सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.

advertisement
05
भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी 1947 साली माऊंटबेटन यांची नियुक्ती करण्यात आली. भारताला आपल्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला.  30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं या मसुद्यात नमूद होतं. मात्र भारतीय नेत्यांचं यावर एकमत झालं नाही.  त्यांनी जून 1948 ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग 1947 हेच वर्ष ठरलं.

भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी 1947 साली माऊंटबेटन यांची नियुक्ती करण्यात आली. भारताला आपल्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला.  30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं या मसुद्यात नमूद होतं. मात्र भारतीय नेत्यांचं यावर एकमत झालं नाही.  त्यांनी जून 1948 ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग 1947 हेच वर्ष ठरलं.

advertisement
06
जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. माऊंटबेटन या तारखेला आपल्यासाठी शुभ मानत होते. तर दुसरीकडे भारतातील ज्योतिष तज्ज्ञ या तारखेला भारतासाठी अशुभ मानत होतं. त्यांनी दुसरी तारीख दिली मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते.

जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. माऊंटबेटन या तारखेला आपल्यासाठी शुभ मानत होते. तर दुसरीकडे भारतातील ज्योतिष तज्ज्ञ या तारखेला भारतासाठी अशुभ मानत होतं. त्यांनी दुसरी तारीख दिली मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते.

advertisement
07
मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं? - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट  तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14  ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.

मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं? - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट  तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14  ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.

  • FIRST PUBLISHED :
  • 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.
    07

    15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास

    15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

    MORE
    GALLERIES