छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं.
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..