अभ्यास : चाणक्य नीतीनुसार दोन व्यक्तींनी एकत्र अभ्यास (Study) करणे योग्य आहे. यामुळे अभ्यास करणे तर सोपे जातेच, पण तुम्ही कोणत्याही विषयात अडलात तर दुसरी व्यक्तीही तुम्हाला मदत करू शकते.
तपश्चर्या : आचार्य चाणक्य यांच्या मते, तपश्चर्याचे (Prayer) खरे फळ तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती एकट्यानेच तपश्चर्या करते. चाणक्याच्या नीतीनुसार अनेक लोकांसोबत तपश्चर्या केल्याने मन अस्वस्थ होऊ लागते आणि तुमची तपश्चर्या कधीच सफल होत नाही.
मनोरंजन : आचार्य चाणक्य यांच्या मते, एकट्याने मनोरंजनाचा (Entertainment) आनंद घेणे हे एक कठीण काम आहे, त्यामुळे मनोरंजनाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी किमान तीन लोकांसोबत असणे आवश्यक आहे. तीन लोकांच्या गटात बसून तुम्ही मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
शेती : चाणक्य नीतीनुसार, शेती (Farming) हा केवळ एक ते दोन लोकांना जमण्यासारखी नसते. उत्तम प्रकारे शेती करण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. किमान पाच जणांनी शेती करणे बंधनकारक आहे.
युद्ध : सहसा युद्ध (Battle) लढण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिकांची आवश्यकता असते. चाणक्य नीती म्हणते की युद्ध कोठेही आणि कोणतेही असो, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक प्रकारचे युद्ध जिंकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. सदरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही.