ऑफिसचा डबा असो की मुलांचा टिफिन बॉक्स हल्ली डब्यातही पदार्थ अल्युमिनियम फॉईलमध्ये टाकून दिले जातात. अन्न जास्त काळ ताजे आणि गरम राहावे म्हणून अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात.
मात्र सहज आणि सोपा वाटणारा पर्याय तितकाच सुरक्षित नसतो. अॅल्युमिनियम फॉईलच्या वापराबद्दल आतापर्यंत अनेक तज्ज्ञांनी मतं दिली आहेत. अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जास्त प्रमाणात करण्याचे तज्ज्ञ समर्थन करत नाही.
अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे एकवेळ चालेल. मात्र उरलेले अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये साठवणे योग्य नाही. असे साठवलेले अन्न सुरक्षित राहत नाही.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतो.
अॅल्युमिनियम फॉइल अन्नामध्ये ऑक्सिजन जाण्यापासून रोखण्यास पुरेसे सक्षम नाही. हे अन्नात बॅक्टेरिया वाढू देते, ज्यामुळे आदल्या यामध्ये साठवलेले अन्न दुसर्या दिवशी किंवा लवकर खराब होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते जेव्हा अन्न अॅल्युमिनियम फॉइलच्या संपर्कात येते तेव्हा त्याचा परिणाम बदलतो. त्यात अॅल्युमिनियमचे घटक येऊ लागतात, त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
अनेक वेळा घाईघाईत आपण गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतो, पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेले अन्न खाल्ल्याने मेंदूच्या पेशींची संख्या कमी होते.
अॅल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिकच्या जेवणाच्या डब्यात अन्न पॅक करण्याऐवजी ते काचेच्या भांड्यात पॅक करणे चांगले. यामुळे अन्नातील पोषक घटक सुरक्षित राहतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)