चाणक्य नीति सांगते ज्याप्रकारे राखेने घासल्यामुळे पितळेचं भांडं चमकतं, तांब्याला चिंचेने घासल्यामुळे चमक येते, नदी वाहत राहिली तर स्वच्छता राहते. त्याचप्रकारे आयुष्यात दुःख आणि कठीण प्रसंग आले तर, माणसाचा आयुष्य सोन्याप्रमाणे सुंदर बनतं.
2/ 7
चाणक्य नीति सांगते की, श्रवण करणं हा चांगला गुण आहे. कारण श्रवणाने ज्ञान वाढतं. मनातील द्वेष दूर होतो आणि ज्ञानाची प्राप्ती होते. कोणत्याही वासने पासून मुक्ती मिळते.
3/ 7
आचार्य चाणक्य यांच्यामते राजा, ब्राह्मण आणि तपस्वी,योगी जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये भटकंती करतात, फिरतात तेव्हा त्यांना ज्ञान आणि आदर प्राप्त होतो.
4/ 7
मात्र माणूस आपल्या चांगल्या मार्गावरून दूर झाला तर, तो बरबाद होतो.
5/ 7
चाणक्य नीतिनुसार धनवान व्यक्तीकडे मित्र आणि अनेक नातलग देखील असतात. हे लोक धनवान लोकांना जास्त महत्त्व देतात. कारण ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडेच सुविधाही उपलब्ध असतात.
6/ 7
आचार्य चाणक्य यांच्यामते सर्वशक्तिमान माणूस तोच आहे ज्याच्या इच्छेनुसार त्याची बुद्धी काम करते. ज्याची बुद्धी त्याच्या कर्मांना नियंत्रित करते. मदत करणारे लोक सुद्धा त्याच्याजवळ येता.
7/ 7
चाणक्य नीतिनुसार काळाबरोबर माणूस आयुष्यभर गोष्टी शिकत असतो. ज्ञान असेल तर, सगळ्या लोकांना मदत करता येते. काळावर कोणालाच विजय मिळवता येत नाही. सतत जागृत असणारा माणूसच विजयी होतो.