अनेक असे मराठी सेलिब्रिटी आहेत ज्यांच पहिलं प्रेम हे त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलं होतं. पण कालांतराने ते वेगळे झाले. पाहा कोण आहेत हे प्रसिद्ध कपल्स.
अक्षया देवधर आणि सुयश टिळक अभिनेता सुयश आणि अश्रया गेले काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांची रिलेशनशिप त्यांना जाहीर देखील केली होती. अनेकदा ते एकत्र फोटो शेअर करायचे मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. तर नुकताच सुयशने प्रेयसी आयुशी भावे हिच्याशी साखरपुडा केला आहे.
पूजा पुरंदरे आणि विजय अंदाळकर पूजा आणि विजय यांनी २०१७ साली धूमधडाक्यात लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काहीच वर्षात ते वेगळे झाले. लग्नाची वाईफ वेडींगची बायको मालिकेत त्याने काम केलं होतं. तर त्यातीलच कोस्टार रुपाली झनकर हिच्याशी त्याने एप्रिल महिन्यात साखरपुडा करून साऱ्यांनाच धक्का दिला होता. पूजा सध्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत काम करत आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मुग्धा परांजपे सिद्धार्थ मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याचं अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. तर मुग्धासोबत तो काही काळ डेट करत होता. पण नंतर ते वेगळे झाले. तर त्याने मिताली मयेकरशी लग्नगाठ बांधली.
मिताली मयेकर आणि श्रेयस राजे अभिनेत्री मिताली मयेकर आणि जिगरबाज फेम श्रेयस काही काळ एकमेकांना डेट करत होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. या वर्षाच्या सुरुवातीला मितालीने सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह केला. २ वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी केलं.
अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष अभिनेता अनिकेत आणि पल्लवी ही जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होती. जवळपास ८ वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अनिकेतने त्यानंतर स्नेहा चव्हाण हिच्याशी विवाह केला.
शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान छोट्या पडद्याची लोकप्रिय जोडी शशांक आणि तेजश्री यांचं नात सर्वश्रुत होतं. धुमधडाक्यात लग्न केल्यानंतर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शशांकने प्रियंका ढवळे हिच्याशी विवाह केला.
संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील संग्राम आणि पल्लवी यांनीही धुमधडक्यात विवाह केला होता. पण काही काळातच तेही विभक्त झाले. त्यानंतर संग्रामने श्रद्धा पाठक हिच्याशी विवाह केला आहे.