सध्या मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या लग्नाची. कारण या दोघांनी एकाच मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल टाकले होते. पण आता मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
2/ 10
छोट्या पडद्यावरील 'ती परत आलीये' या मालिकेतील रिल लाईफ जोडी नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी ख-या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
3/ 10
मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडला आहे.
4/ 10
नचिकेत आणि तन्वी यांनी इन्स्टा स्टोरीवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
5/ 10
नचिकेत आणि तन्वीच्या लग्नाला अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी हजेरी लावली होती.
6/ 10
मेंदी आणि हळदीच्या सोहळ्यानंतर मंगळवारी त्यांचे लग्न पार पडले.
7/ 10
नचिकेत आणि तन्वीचा याच वर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता.
8/ 10
आता त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले आहे.
9/ 10
'ती परत आलीये' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नचिकेत आणि तन्वी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते.
10/ 10
या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.