अभिनेते अरविंद स्वामी यांनी 1991मध्ये मणिरत्न यांच्या थलापती सिनेमातून सुरूवात केली. त्यावेळी अरविंद केवळ 20 वर्षांचा होता. त्यानंतर 1992मध्ये आलेला रोझा, 1995मध्ये आलेला बॉम्बे अशा उत्तम सिनेमातून त्याने अभिनय केला. 1997मध्ये आलेल्या मिनसारा कनावु या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सिनेमातून अरविंदचा स्टारडम चांगलाच वाढला.
सात रंग के सपने या सिनेमातून अरविंदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री जुही चावलाबरोबर त्याने स्क्रिन शेअर केली होती.
अभिनय क्षेत्रात नाव कमावत असताना अचानक अरविंद स्वामीला अर्धांगवायूचा झटका आला. वयाच्या 30 व्या वर्षी तो अर्धांगवायूसारख्या आजाराशी झगडत होता. तसंच 90च्या दशकात अरविंगचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमागिरी करू शकले नाहीत.
साल 2000 पासून अरविंदने सिनेमात काम करणं बंद केलं. आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्याने लक्ष केंद्रीत केलं. डी स्वामी अँड कंपनी त्यानंतर इंटरप्रो ग्लोबल असा कंपनीमध्ये त्याने काम सुरू केलं. 2000च्या सुरूवातीपासूनच अरविंद एक यशस्वी उद्योजक म्हणून चर्चेत येऊ लागला. 2005मध्ये पर्यंत त्याने व्यावसाय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला.
2005मध्ये अरविंद स्वामीचा एक अपघात झाला ज्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्याच्या उपचारात जवळपास 4-5 वर्ष निघून गेली. अपघाताआधी स्वामीने पेरोल प्रोसेसिंग अँड अस्थायी स्टाफिंग मध्ये टॅलेंट मैक्सिमस कंपनीची स्थापना केली.
2013मध्ये अभिनेता अरविंदने जवळपास एका दशकाच्या ब्रेकनंतर पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. 2021मध्ये कंगना रणौतबरोबर थलायवी सिनेमात त्यांनी एमजी रामचंद्रन ही भूमिका साकारली होती.
अरविंदकडे सध्या एक नाही तर तीन प्रोजेक्ट्स आहेत. अभिनेता नागा चैतन्यच्या कस्टडी सिनेमात तो शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता Naragasooran, Kallapart आणि Sathuranga Vettai 2या सिनेमात अरविंद दिसणार आहे.