प्रसाद ओक त्याची बायको मंजू यांच्या लग्नाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.प्रसादप्रमाणेच मंजिरी सुद्धा कलाविश्वात सक्रिय आहे.
अभिनयविश्वात पदार्पण करण्याआधी प्रसाद एक अभिनयाचा वर्कशॉप घेत होता. या वर्कशॉप मध्ये अभिनय शिकायला मंजिरी देखील यायची.
या वर्कशॉपमध्येच या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. या वर्कशॉप नंतर दोघांचा कॉन्टॅक्ट वाढला. दोघांचा सहवास वाढला आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.
पण त्यांच्या लव्हस्टोरीत मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे मंजिरीच्या घरच्यांनी दोघांच्या नात्याला विरोध केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी अखेर 7 जानेवारी 1998 रोजी लग्नगाठ बांधली.
या दोघांनी आज सुखी सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली असून त्यांना मयांक आणि सार्थक नावाची दोन मुले देखील आहेत.
आजच्या दिवशी मंजिरीने सोशल मीडियावर प्रसादसाठी खास पोस्ट करत लिहिलं आहे कि, 'प्रिय प्रसाद ..९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही दिवस “रणांगण” तापलं होतं...'
'पण हळू हळू "अशी बायको हवी" म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही "साहेबजी डार्लिंग" झालीच. आणि "धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला.'
'तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “ आहे . पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी"???'
'आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं . यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं" म्हणतच राहुयात.'