एक दमदार अभिनेत्री म्हणून नीतू सिंहची ओळख होतीच मात्र ऋषी कपूर यांची पत्नी कपूर घराण्याची सून अशी वेगळी ओळख तिला लग्नानंतर मिळाली. 15 वर्षांची असताना नीतू सिंह 21 वर्षांच्या ऋषी कपूर यांच्या प्रेमात पडली होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी पाहूयात.
1974मध्ये नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांची जहरीला इंसान सिनेमाच्या सेटवर पहिली भेट झाली. तेव्हा नीतू 15 वर्षांची होती. सेटवर दोघांची छान मैत्री झाली.
नीतू सिंह भेटण्याआधी ऋषी कपूर यांची एक गर्लफ्रेंड होती. तिच्याशी त्यांचं भांडण झालं की ते नीतू कडून लेटर लिहून घ्यायचे.
नीतू सिंह अनेकदा दोघांच्या भांडणानंतर त्यांना लेटर्स लिहून दिली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री वाढली.
काही महिन्यात ऋषी कपूर आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचा ब्रेकअप झाला. ऋषी आणि नीतू एकमेकांना डेट करू लागले. पण त्यांचं प्रेम राज कपूर यांना मान्य नव्हतं.
पण मी नीतूवर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करेन असा हट्ट ऋषी कपूर यांनी धरला होता. अखेर मुलाच्या प्रेमापोटी राज कपूर दोघांच्या लग्नाला तयार झाले.
नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांनी 1979मध्ये लग्न केलं. राज कपूर यांच्याप्रमाणेच नीतू सिंहची आई देखील त्यांच्या लग्नामुळे खुश नव्हती.
दोघांच्या लग्नातील एक मजेशीर किस्सा असा की, लग्नात दोघेही बेशुद्ध झाले होते. नीतू सिंहनी लग्नासाठी फार जड लेहंदा खरेदी केला होता. तो सांभाळताना तिच्या नाकीनऊ आले आणि शेवटी ती बेशुद्ध झाली.
तर ऋषी कपूर हे कपूर घरातील लाडका मुलगा होते. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक लग्नाला आले होते. लग्नात ऋषी कपूर यांच्या आजूबाजूला इतके लोक होते की ऋषी कपूर यांना गर्दीमुळे भोवळ आली.