बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकेकाळी मुख्य नायिका होत्या. तर त्यांचे लाखो चाहते देखील होते. मात्र आज त्या बॉलिवूडच नाही तर सिनसृष्टीपासूनच दूर आहेत. व कधीही परतल्या नाहीत. पाहा कोण आहेत या अभिनेत्री.
2/ 8
अभिनेत्री किमी काटकर (Kimi Katkar) एकेकाळी सुपरहीट अभिनेत्री होती. खून का कर्ज हा तिचा चित्रपट ठरला होता. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने 'जुम्मा चुम्मा दे दे' हे गाण विशेष लोकप्रिय ठरंल होतं.
3/ 8
मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) हीने 'शेहंशाह', 'दामिनी', 'सत्यमेव जयते' असे हीट चित्रपट दिले होते. तिने हिरो या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ती 1981साली मिस इंडिया देखील ठरली होती.
4/ 8
अनु अग्रवाल (Anu Aggarwal) तिच्या सुपरहिट आशिकी या चित्रपटासाठी ओळखली जाते. तिने साउथ चित्रपटांतही काम केलं होतं.
5/ 8
ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) करण -अर्जून या सुपरहीट चित्रपटात काम केलं होतं. पण काही काळातचं तिने बॉलिवूड आणि सिनेसृष्टी सोडली.
6/ 8
फराह नाझ (Farah Naaz) ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. तिने 'नसीब अपना अपना', 'इमानदार', 'भाई हो तो ऐसा' यासारख्या अनेक चित्रपटांत काम केलं होतं.
7/ 8
संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी 1980 साली मिस इंडिया ठरली होती. तिने 'खून का कर्ज', 'हातिम', 'त्रिदेव' या चित्रपटांत काम केलं होतं.
8/ 8
झेबा बख्तियार (Zeba Bakhtiar) ही एक पाकिस्तानी अभिनेत्री होती. 1991 साली तिने 'हीना' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.