तारक मेहता का उल्टा चश्मा या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शोला 15 वर्ष पूर्ण झालीत. या 15 वर्षात शो मधून अनेक कलाकारांनी एक्झिट घेतल्या आहेत. दया बेनने शो सोडल्यानंतर एकापाठोपाठ जवळपास 9-10 कलाकारांनी शोला टाटा बाय बाय म्हटलं. कोण आहेत हे कलाकारा पाहूयात.
अभिनेत्री प्रिया अहुजानं मालिकेत रीटा रिपोर्टरची भुमिका साकारली होती. रीटा रिपोर्टर फारच प्रसिद्ध झाली. रीटा रिपोर्टरनं काही दिवसांआधीच मालिकात सोडली आहे. काही महिन्यांआधीच शोचा दिग्दर्शक मालव राजदानं शो सोडला होता. मालव हा प्रियाचा नवरा होता. त्याने मालिका सोडल्यानंतर प्रिया देखील मालिका सोडणार आहे अशा चर्चा होत्या. अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या.
तारक मेहतामध्ये सोढीच्या भुमिकेत दिसणारा अभिनेता गुरूचरणनं देखील वैयक्तिक कारण देत शो सोडला होता. शोच्या निर्मात्यांबरोबर मला कोणत्याही वादात अडकायचं नाहीये, असं म्हणत गुरूचरण यांनी शो ला रामराम ठोकला होता.
शो मध्ये सोनूची भुमिका साकारणारी अभिनेत्री निधीनं शो सोडून तिच्या शिक्षणासाठी 2018मध्ये सिटकॉमला गेली. 2012 पासून निधी शोचा भाग होती.
तारक मेहता का उल्टा चश्मा शोचा आत्मा असलेली दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी. 2017मध्ये दिशा वकानीने मॅटरनिटी लिव्ह घेतली आणि त्यानंतर ती पुन्हा कधीच शो मध्ये दिसली नाही. 2017 पासून दिशानं दोन मुलांना देखील जन्म दिला. प्रेक्षक अजूनही नव्या दया बेनच्या प्रतिक्षेत आहेत.
तारक मेहता शो मध्ये बावरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया हिनं देखील शो सोडला. जेनिफरने निर्मात्यांनी आरोप केल्यानंतर मोनिकानं देखील तिला टॉर्चर करत असल्याचा आरोप करत मालिका सोडली होती. 2013-2013 पर्यंत मोनिका शोमध्ये होती.
अभिनेत्री नेहा मेहता हिने शो मध्ये शैलेश लोढाची पत्नीची म्हणजेच अंजलीची भुमिका साकारली होती. मी शोमध्ये 12 वर्ष काम करतेय पण सहा महिन्यांपासून मला पैसेच दिले नसल्याचा आरोप करत नेहाने 2022मध्ये शो सोडाल होता.
तारक मेहता शोमध्ये जेठालालचा मुलगा म्हणजेच टप्पूची भुमिका अभिनेता राज अनादकट याने साकारली होती. 2022मध्ये राजने शो सोडला.
अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शो मध्ये मिसेस रोशनीची भुमिका साकारली होती. जेनिफर रोशनीच्या भुमिकेमुळे घराघरात पोहोचली. पण लैंगिक शोषण आणि मानसिक अत्याचाराचा आरोप करत जेनिफरनं शो सोडला. जेनिफर 2008-2013 आणि 2016-2023 या काळात शोमध्ये होती.
अभिनेते शैलेश लोढा यांनी मागील वर्षीच तारक मेहता शोला रामराम ठोकला. शैलेश लोढा मालिकेतून गेल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.