नवी दिल्ली, 4 जून : कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. दररोजच्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, तांदूळ, मैदा, डाळी, बटाटा, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले असून तर दुसरीकडे मागणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राइस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार 114 रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या उडीदाच्या डाळीची किंमत 108 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली आहे. त्याचबरोबर मूग डाळच्या किंमतीत गेल्या 1 महिन्यांत प्रति किलो 5 रुपयांची घट दिसून आली आहे. 31 रुपये प्रतिकिलोला मिळणाऱ्या टोमॅटोच्या किंमतीही 12 रुपयांनी घसरल्या आहेत. स्वस्त भाज्या, कडधान्य, तांदूळ आणि पीठ कोरोना संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत कमी झाल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राइस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार गेल्या 1 महिन्यात किंमतींमध्ये घट झाली आहे. मैदा, मसूर, तांदूळ, खाद्यतेल, बटाटे कांदे, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. 29 रुपये किलो असणारी तांदळाची किंमत एका महिन्यात 2 रुपयांनी घसरून 27 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पीठाची किंमतीतही घट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर 86 रुपये प्रतिकिलो हरभरा डाळीची किंमत 1 महिन्यात 76 रुपयांवर आली आहे. या व्यतिरिक्त, एका महिन्यात 106 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेल्या अरहरच्या डाळींचे दर 1 महिन्यात 101 रुपये प्रति किलोवर घसरले आहेत. स्वस्त होण्याची कारणे – खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होण्याचे कारण म्हणजे यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर पिकांची निर्यात बंद झाल्याने किंमतीही खाली आल्या आहेत. हे वाचा- निसर्ग चक्रीवादळाचं थैमान.. जाणून घ्या पुण्यात कुठे आणि किती पडला पाऊस?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.