जाहिरात
मराठी बातम्या / देश / दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई, शिवसेनेच्या 'अर्जुनाने' शिंदे गटात टाकले पाऊल

दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई, शिवसेनेच्या 'अर्जुनाने' शिंदे गटात टाकले पाऊल

 अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.

अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.

अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जुलै : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदेंच्या गटात सामील झाले आहे. अशातच जालन्याचे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर सुद्धा शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा रंगली आहे. अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सध्या दिल्लीत दाखल झाले आहे. मागील आठवड्याभरापासून ते दिल्लीत मुक्कामी आहे. या आठवड्यभरात त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. भाजपचे नेत्यांच्याही खोतकरांनी भेटी घेतल्या आहेत. आज दुपारी खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सुद्धा पोहोचले आहे. दरम्यान, ‘मी शिवसेना सोडली असं सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आहेत. पण असं कुठेही काही घडलं नाही. मी आजही शिवसेनेत आहे, मी शिवसैनिक आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहे. दरम्यान, यावेळी भेटीच्या वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने  दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत केली आहे. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात