कटक,16 जानेवारी: ओडिशामधील कटकजवळ मुंबई(लोकमान्य तिलक टर्मिनस)-भुवनेश्वर एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. सालागाव आणि नरगुंडी स्टेशन दरम्यान मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसने मालगाडीला जोरदार धडक दिली. एक्स्प्रेसचे 8 डबे रूळावरून घसरले असून या अपघातात 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून स्थानीय नागरिक मदतीसाठी धाऊन आले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ओडिशा: कटक में ट्रेन हादसा, 8 डब्बे पटरी से उतरे, 40 से ज्यादा यात्री घायल@jaspreet_k5 pic.twitter.com/JaNT6KwcUw
— News18 India (@News18India) January 16, 2020
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सालागाव- नीरगुंडी स्टेशन दरम्यान सकाळी सात वाजता हा अपघात झाला. यात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटन घडली तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूके होते. त्यामुळे अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन नंबर 0674-1072 आणि 0671-1072 जारी केले आहेत.
#UPDATE Chief Public Relation Officer (CPRO), East Coast Railway: 20 people injured after eight coaches of Lokmanya Tilak Express derail near Salagaon. No casualty reported till now. #Odisha https://t.co/JqaXdhzHTN
— ANI (@ANI) January 16, 2020
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..