मराठी बातम्या /बातम्या /देश /ऐश्वर्या राय पोहोचली पाटणा न्यायालयात, वाचा, काय आहे मागणी?

ऐश्वर्या राय पोहोचली पाटणा न्यायालयात, वाचा, काय आहे मागणी?

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील (India Politics) प्रचलित नाव आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याच परिवाराशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सून आणि तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी पुन्हा एका न्यायालयात धाव घेतली आहे.

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील (India Politics) प्रचलित नाव आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याच परिवाराशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सून आणि तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी पुन्हा एका न्यायालयात धाव घेतली आहे.

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील (India Politics) प्रचलित नाव आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याच परिवाराशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सून आणि तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी पुन्हा एका न्यायालयात धाव घेतली आहे.

पुढे वाचा ...

पाटणा, 14 मे : लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील (India Politics) प्रचलित नाव आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याच परिवाराशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सून आणि तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी पुन्हा एका न्यायालयात धाव घेतली आहे.

23 जूनला पुढील सुनावणी - 

पोटगीची रक्कम वाढून मिळावी, यासाठी त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. 12 मे रोजी त्यांनी न्यायालयात धाव घेत हे अपील दाखल केले. न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून तेज प्रताप यांना नोटीसही जारी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 जूनला होणार आहे.

न्यायालयाचा याआधीचा आदेशात काय म्हटलंय

तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या यांना प्रत्येक महिन्याला 23 हजार रुपये पोटगीच्या स्वरुपात देण्यात यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता ही रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ऐश्वर्या यांनी केली आहे. 12 मे 2018 रोजी लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले होते. तर ऐश्वर्याने 12 मे 2022 रोजीच पोटगी वाढवण्यासाठी अपील दाखल केले आहे. म्हणजेच लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर ऐश्वर्या रायने पोटगी वाढवण्यासाठी अपील दाखल केले आहे.

हेही वाचा - मुस्लीम तरुणीला मंचावर बोलावण्यास मौलवींनी घेतला आक्षेप; त्यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी...

तेज प्रताप यांच्या वतीने त्यांचे वकील जगन्नाथ सिंह यांनी नोटीस स्वीकारली आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या तारखेला दोघांचे लग्न झाले होते, त्या तारखेला पोटगी वाढवण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे, हा देखील एक विचित्र योगायोग आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 23 जूनला होणार आहे.

विशेष म्हणजे लग्नाच्या काही महिन्यांनंतर तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी पाटणाच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ही बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला होता. तेज प्रताप यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोपही केले होते. ऐश्वर्या राय रडत रडत राबडी आवास सोडून वडील चंद्रिकाय राय यांच्या घरी गेली. त्यावेळी ऐश्वर्या रायने राबडी देवी, मीसा भारती आणि तेज प्रताप यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. सध्या दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, High Court, Patna