बंगळूरू, 08 जुलै : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारवरील संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देखील देण्यात आली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यानंतर काँग्रेस- जेडीएसला आणखी एक धक्का बसला असून अपक्ष आमदार नागेश यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे देखील पाठवून दिला आहे. दरम्यान, सध्य स्थितीमध्ये सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस – जेडीएस आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकते. राजीनामा दिलेल्या 13 आमदारांना मंत्रिपदं आणि त्यांच्या मतदारसंघाकरता स्पेशल पॅकेज देण्याची तयारी दर्शवण्यात आली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
दहशतवादी बुरहान वाणीमुळे रोखली गेली अमरनाथ यात्रा कर्नाटकात भाजपची सत्ता? 13 आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे आता भाजप सत्ता स्थापन करणार का? या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 2018मध्ये सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस – जेडीएसला सत्तेत येऊन 13 महिने झाले आहेत. तत्पूर्वी भाजपनं देखील सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. पण, केवळ अडीच दिवसांमध्ये बहुमत सिद्ध न करता आल्यानं भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसशी हातमिळवणी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. हा सारा प्रकार भाजपच्या जिव्हारी लागला होता. शिवाय, काँग्रेस - जेडीएसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं माजी मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी म्हटलं होतं. मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की