नवी दिल्ली, 25 जून : आणीबाणी ! 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर देशातील वातावारण बदलून गेलं. लोकशाहीला नख लावण्याचा प्रकार म्हणून देखील आणीबाणीबद्दल बोललं जातं. शिवाय, इंदिरा गांधींच्या या निर्णयावर आज देखील सर्वच स्तरातून टिका केली जाते. आणीबाणीला आज अर्थात 25 जून रोजी 44 वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
India salutes all those greats who fiercely and fearlessly resisted the Emergency.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2019
India’s democratic ethos successfully prevailed over an authoritarian mindset. pic.twitter.com/vUS6HYPbT5
तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
1975 में आज ही के दिन मात्र अपने राजनीतिक हितों के लिए देश के लोकतंत्र की हत्या की गयी। देशवासियों से उनके मूलभूत अधिकार छीन लिए गए, अखबारों पर ताले लगा दिए गए। लाखों राष्ट्रभक्तों ने लोकतंत्र को पुनर्स्थापित करने के लिए अनेकों यातनाएं सहीं।
— Amit Shah (@AmitShah) June 25, 2019
मैं उन सभी सेनानियों को नमन करता हूं। pic.twitter.com/XzRc4vEdJS
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असं ट्विट केलं आहे. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयावर आज देखील जोरदार टिका केली जाते. SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल