आदित्य कृष्ण, प्रतिनिधी
अमेठी, 2 एप्रिल : आंबा अजून पिकून बाजारात आलेला नाहीए. मात्र, तरी बाजारातील दुकानांवर आंब्याचा रस विकला जात आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक गल्लीबोळात आंब्याच्या रसाची दुकाने थाटली असून विविध ठिकाणांहून येणारे लोक काउंटर उघडून आंब्याचा रस विकत आहेत. मात्र, हा रस तुमच्यासाठी धोका ठरू शकतो, असे तज्ञ सांगत आहेत.
आंबा मे आणि जूनमध्ये पिकतो, असा अंदाज आहे. मात्र, नुकताच एप्रिल महिना सुरू झाला आहे. दरम्यान, बाजारात आंबे आले असून ते लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. यासोबतच आंब्याच्या रसही ठिकठिकाणी काउंटरवर विकले जात आहेत. आंब्याचा रस 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत विकला जात आहे. मात्र, हा आंब्याचा रस आरोग्याला घातक आहे. माणसाला एका दिवसात फक्त 20 ते 30 ग्रॅम साखरेची गरज असते. पण बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात फूड कलर आणि साखर मिसळली जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आंब्याच्या रसामध्ये पोषक आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. बाजारात विकल्या जाणाऱ्या आंब्याच्या रसाची चव जितकी चांगली आहे, तितकीच हानीकारक आहे. जर तुम्ही बाजारातील प्रसिद्ध ब्रँडचा आंब्याचा रस घेत असाल तर तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पहिली बेटी धनाची पेटी, कुटूंब नियोजन केल्यास मिळणार 50 हजार रुपये
रसायनांचा वापर -
अमेठीचे सीएमओ डॉ. विमलेंद्र शेखर म्हणाले की, बाजारात उपलब्ध असलेला आंबा आणि त्याचा रस आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबा आणि त्याचा रस बाजारात उपलब्ध आहे. त्यात केमिकल सापडले आहे. यासोबतच ते गोड करण्यासाठी इतके रसायन वापरले जाते की, त्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत असे खाद्यपदार्थ आणि पेये अजिबात घेऊ नका, अन्यथा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा सल्लाही ते देत आहेत. दरम्यान, अशा परिस्थिती याकडे अन्न विभाग लक्ष का देत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Local18, Uttar pradesh