मराठी बातम्या /बातम्या /देश /चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध! राज्यांना अलर्ट जारी; आपल्याला किती धोका?

चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध! राज्यांना अलर्ट जारी; आपल्याला किती धोका?

चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध!

चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध!

जगातील अनेक देशांमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढत आहेत, ते पाहता कोविड-19 च्या या नव्या लाटेमागे कोरोनाचे कोणताही नवा व्हेरिएंट नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मोठी बैठक बोलावली आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या या बैठकीत आरोग्यमंत्री देशातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आणि तयारी याबाबत आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. अलीकडच्या काळात शेजारील चीन व्यतिरिक्त अमेरिका, जपान, कोरिया आणि ब्राझीलमध्ये कोविड-19 संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. याबाबत केंद्र सरकारही अलर्ट मोडमध्ये आले असून सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून पॉझिटिव्ह केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे, जेणेकरून कोरोनाचे कोणतेही संभाव्य नवीन प्रकार वेळेत शोधता येतील. खरंतर, जगातील अनेक देशांमध्ये ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढत आहेत, ते पाहता कोविड-19 च्या या नव्या लाटेमागे कोरोनाचे कोणतेही नवीन व्हेरिएंट तर नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.

वाचा - उर्फी जावेदला झाला घशाचा संसर्ग, जाणून घ्या कशामुळे होते लेरिन्जाइटिस इंफेक्शन

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की अशा प्रकारच्या पद्धतीमुळे देशातील कोरोना विषाणूचे कोणतेही संभाव्य नवीन प्रकार वेळेवर शोधणे शक्य होईल आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मदत होईल. त्यांनी अधोरेखित केले की चाचणी-निरीक्षण-उपचार-लसीकरण आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन केल्याने, भारत कोरोनाव्हायरसचा प्रसार मर्यादित करू शकला आहे. सध्या देशात आठवड्यात संसर्गाची सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली जात आहेत.

भूषण म्हणाले, "जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि चीनमधील प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता, विषाणूचे नमुने शोधण्यासाठी भारतीय SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियमच्या माध्यमातून संसर्ग प्रकरणांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले जात आहे." संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार करणे आवश्यक आहे.' या कारणास्तव, केंद्र सरकारने राज्यांना इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. केंद्राने पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या ट्रेंडवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. येथे आठवडाभरात 1200 नवीन प्रकरणे नोंदवली जात असली तरी जगभरात दर आठवड्याला कोविड-19 संसर्गाची 35 लाख नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसून त्याबाबत दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

First published:

Tags: China, Corona spread