अग्निपथ योजनेचे घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केली. त्यानंतर या योजनेच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन होत आहे. विशेषत: बिहारमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमध्ये या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग उत्तर भारतामधील राज्यांप्रमाणेच दक्षिण भारतामध्येही पसरली आहे. शुक्रवारी तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरही या योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन बिहारमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी तसेच विविध विद्यार्थी संघटनांसह अनेक विरोधी पक्षांनी शनिवारी बिहार बंदची हाक दिली आहे.बिहार बंद दरम्यान परिस्थिती बिघडल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. एडीजी संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ज्या भागात तणावाचे वातावरण आहे त्या भागात तीन निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या एकूण 10 तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. तैनात केलेल्या निमलष्करी दलांमध्ये आरएएफची एक तुकडी, सीआरपीएफच्या तीन कंपन्या आणि एसएसबीच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे.8 सालों से लगातार भाजपा सरकार ने ‘जय जवान, जय किसान' के मूल्यों का अपमान किया है।
मैंने पहले भी कहा था कि प्रधानमंत्री जी को काले कृषि कानून वापस लेने पड़ेंगे। ठीक उसी तरह उन्हें ‘माफ़ीवीर' बनकर देश के युवाओं की बात माननी पड़ेगी और 'अग्निपथ' को वापस लेना ही पड़ेगा। — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Pm modi, Rahul gandhi