जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / rajya sabha election : फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक, भाजप तिसरी जागा लढवणार की माघार?

rajya sabha election : फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक, भाजप तिसरी जागा लढवणार की माघार?

 उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे.

उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे.

उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जून : राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) चुरस आता आणखी वाढली आहे. भाजपने तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राज्यसभेतून कोण अर्ज मागे घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे. भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, भाजपकडे तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भाजपने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे,  उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे.  या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, प्रविण दरेकर,  प्रसाद लाड उपस्थित राहणार आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर तिसऱ्या जाागेचा सस्पेन्स कायम होता. पण तिसरी जागा लढवणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे.  कोल्हापूरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी धनंजय महाडिक मैदानात उतरले आहे. शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. 13 मत कमी असतानाही भाजपने उमेदवार उतरवण्याची खेळी करून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. राज्यसभेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपकडून तिसऱ्या जागी उमेदवारी मागे घेतली जाणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. एकूण 6 जागांसाठी आता 7 उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे भाजपने जर आपला तिसरा उमेदवार मागे घेतला तर राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात