मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /काँग्रेसचा पराभव थोरातांच्या जिव्हारी? म्हणाले, आता सरकार म्हणून विचार करण्याची गरज

काँग्रेसचा पराभव थोरातांच्या जिव्हारी? म्हणाले, आता सरकार म्हणून विचार करण्याची गरज

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या पराभवानंतर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या पराभवानंतर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या पराभवानंतर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 20 जून : राज्यसभेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी विधान परिषदेला (MLC Election result) काळजी घेतली होती. अगदी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवण्यापासून मतदान करण्याची रंगीत तालीम देखील घेतली. मात्र, इतकं सारं करुनही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. हाती आलेल्या निकालानुसार देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी झाल्याचे दिसते. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड जिंकले आहेत. दुसरीकडे आपला एक उमेदवार पराभूत झाल्याचे काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या पराभवानंतर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडीची 21 मतं फुटली

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. यात काँग्रेसची 3 मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला 44 पैकी फक्त तीन मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

MLC Election result : फडणवीसांचा डाव पुन्हा यशस्वी, काँग्रेसची 3 मतं फुटली

सरकार म्हणून विचार करण्याची गरज : थोरात

विधान परिषदेतील काँग्रेसचा झालेला पराभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर त्यांना माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थोरात म्हणाले, की हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजून असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे.

10 जागांसाठी 11 जण रिंगणात

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही काळजी घेतली होती. मात्र, तरीही तीनही पक्षांचं मतदान फुटल्याने ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे.

First published:

Tags: Balasaheb thorat