मुंबई, 24 जुलै : राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Maharashtra) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. याच काळात झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संदर्भातील राज्य सरकारने जी आकडेवारी दिली आहे ती नक्कीच धक्कादायक आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत तब्बल 136 जणांचा मृत्यू (136 people lost life) झाला आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 23 जुलै 2021 या पावने दोन महिन्यांच्या कालावधीत 136 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. मुसळधार पाऊ, पूरस्थिती आणि त्यामुळे उद्भवलेल्या इतर घटनांत या नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्याप 45 नागरिक हे बेपत्ता आहेत.
या कालावधीत 70 नागरिक जखमी झाले आहेत. तर 38 जणावरे दगावली आहेत. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत बचावकार्य करुन 1200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
1 जून ते 23 जुलै 2021 पर्यंतची आकडेवारी
मृत्यू - 136
बेपत्ता व्यक्ती - 45
जखमी व्यक्ती - 70
जनावरे मृत्युमुखी - 38
बचावकार्य
रत्नागिरी - 1200
सातारा - 27
मृतकांचा आकडा वाढण्याची भीती
राज्य सरकारने दिलेली ही आकडेवारी 21 जिल्ह्यांतील आहे. तसेच रत्नागिरी, रायगड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत अद्यापही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य सरकारकडून जी नव्याने आकडेवारी जाहीर करण्यात येईल त्यात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Rain, Rain flood