'ॲंटीजन चाचण्यांचे रिपोर्ट हे 65 टक्के चूक ठरतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे RT-PCR चाचण्या करणेच आवश्यक आहे. राज्यात रोज 54000 पेक्षा जास्त RT-PCR चाचण्या करण्याची क्षमता असताना त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला गेला पाहिजे' अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 'आपल्या कोरोना लढ्याचा मार्ग हा अधिकाधिक वैज्ञानिक असायला हवा. कोरानाच्या लढ्यातील आपल्या सध्याच्या व्युव्हरचनेचा पुनर्विचार केला पाहिजे' असंही फडणवीस म्हणाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के तर दुसरीकडे राज्यात 9 ऑगस्ट रोजी हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झाला आहे. गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 13,348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झाली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली. राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के एवढे आहे. राज्यात 10 लाख 588 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरणात आहेत तर 34 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात एक लाख 25 हजार 558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.Out of total 78,711 #COVID19 tests done on 6th Aug‘20
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 9, 2020
50,421 were antigen tests(64%)
&
only 27,440 were RT-PCR(34%)
&
850tests using other methods.This ratio has to be 1:1 & not 1:2.
Due to 65%failure rate of Antigen testing,RT-PCR is only considered as golden method for testing. pic.twitter.com/iVcwG1sfbi
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.