मुंबई, 5 जानेवारी : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली (Increasing number of corona patients in stat has raised concerns) आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी काय करावं यासाठी एक बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया देत मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे.
10 टक्के लोकांचं लक्षणे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार आज बैठक झाली. या बैठकीत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना कराव्या यावर चर्चा झाली. आकडेवारी पाहिली तर तीन दिवसांत रु्गण संख्या दुप्पट होणारी आहे. निश्चितच ही चिंता वाढवणारी बाब आहे. पण यात चांगली बाब असी आहे की, संख्या वाढत असली तरी 90 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीयेत. संख्या वाढत असली तरी 90 टक्के लोकांना लक्षण नाहीत. केवळ 10 टक्के लोकांचं लक्षण आहेत.
वाचा : मंत्रालयातील बैठक संपली, लॉकडाऊन लागणार?
लसीकरण झालेले सुद्धा बाधित होतात पण त्याची तीव्रता आजिबात नाहीये. त्यामुळे लसीकरण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लसीकरण करणे गरजेचे आहे. सर्व हेल्थ वर्कर्सचा बुस्टर डोस सध्या शासकीय रुग्णालयात देण्याचा निर्णय होता पण आता आम्ही बुस्टर डोसची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे असंही राजेश टोपे म्हणाले.
क्वारंटाईनचा कालावधी किती?
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, RTPCR ऐवजी अँटीजन टेस्ट करण्यावर अधिक भर देण्यात येईल. अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा आरटीपीसीआर करण्याची गरज नाही. केमिस्टमधील कर्मचाऱ्यांनी अँटीजन टेस्टसाठीच्या किटच्या विक्रीची नोंद ठेवणे. क्वारंटाईनचा कालावधी 5 दिवस, 7 दिवस की 14 दिवस असा प्रश्न होता पण आता क्वॉरंटाईनचा कालावधी हा 7 दिवसांचा असणार आहे.
वाचा : तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने खर्चच केला नाही
100 टक्के बंद करण्याची आवश्यकता नाही
आज कोरोना बाधितांची रुग्ण संख्या 25 हजारांवर तर उद्या 30 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 100 टक्के बंद करण्याची आवश्यकता आज तरी नाहीये. ज्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत, त्या थांबवण्याची गरज. कोरोनाला आळा घालणे म्हणजे गर्दी रोखणे. या संदर्भात मुख्यमंत्री यांना माहिती दिली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Rajesh tope, महाराष्ट्र