जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आर्यन खान प्रकरणात हिरोगिरी भोवले, समीर वानखेडेंची अखेर महाराष्ट्राबाहेर बदली

आर्यन खान प्रकरणात हिरोगिरी भोवले, समीर वानखेडेंची अखेर महाराष्ट्राबाहेर बदली



अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात तोंडघशी पडलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आता मोठा दणका देण्यात आला आहे. अखेरीस समीर वानखेडे यांची मुंबईतील सुट्टी करण्यात आली आहे. त्यांची बदली आता चैन्नईला करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruise drug party case) एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली होती. बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याने या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा झाली. त्याच प्रकरणात आता एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे. समीर वानखेडे यांना आता मुंबईतून बाहेर बदली करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार चेन्नई येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, “मी या प्रकरणाशी आता संबंधित नाहीये आणि यावर भाष्य करू इच्छित नाही”. काय आहे प्रकरण? 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. हायप्रोफाईल अशा कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खान याला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. आर्यन खानसह एकूण 6 जणांना एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. पुराव्यांअभावी साह जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे तर इतर 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दतवाढ दिलेली. हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ 29 मे रोजी संपुष्टात येणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात