सोमवारची रात्र मुंबईत या अपघातात सापडलेल्यांसाठी काळरात्र ठरली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण जंखमी आहेत. यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. तर मृतांमध्ये 5 वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक बसल्याने हा अपघात घडला.
सोमवारी मध्यरात्री मध्यरात्री मुंबई लेनवर खालापूर याठिकाणी अपघात झाला, त्याठिकाणची ही भयंकर दृश्य आहेत. यामध्ये गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
मुंबईच्या गोरेगावमधील मंजू प्रकाश नाहर (58), नवी मुंबईच्या नेरुळ याठिकाणचे डॉ. वैभव वसंत झुंझारे (41), उषा वसंत झुंझारे (63), वैशाली वैभव झुंझारे (38), श्रिया वैभव झुंझारे (5) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नाव आहेत.
गोरेगावमधीलच स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), नवी मुंबईतील अर्णव वैभव झुंझारे (11) हे लोकं या अपघातात जखमी झाले आहेत. तर किशन चौधरी आणि काळूराम जमनाजी जाट गंभीर जखमी आहेत.
दरम्यान या अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवर विविध तीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर मुंबईच्या दिशेन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु आता सर्व अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झालेली आहे