मराठी बातम्या /बातम्या /मनी /काही तासात नवा अर्थसंकल्प; 2022 मध्ये मोदी सरकारने कोणत्या केल्या होत्या घोषणा? पूर्ण झाल्या का?

काही तासात नवा अर्थसंकल्प; 2022 मध्ये मोदी सरकारने कोणत्या केल्या होत्या घोषणा? पूर्ण झाल्या का?

यंदाच्या अर्थसंकल्पात मिळेल का करसवलत? सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा?

यंदाच्या अर्थसंकल्पात मिळेल का करसवलत? सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा?

2022 मध्ये निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात काय घोषणा केल्या होत्या, त्या झाल्या का पूर्ण?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 31 जानेवारी : पुढील काही तासात 2023 च्या अर्थसंकल्पाला सुरुवात होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहे. पुढील वाटचालीपूर्वी गेल्या वर्षीच्या बजेटकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारने अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या आणि त्यापैकी किती पूर्ण झाल्या यावर आपण नजर टाकणार आहोत.

देशातील वाढती बेरोजगारी आणि कमी होणारं नोकऱ्यांचं प्रमाण यावरही घोषणा करण्यात आली होती. तर जगभरात ट्रेंडिंग असणारं डिजिटल शिक्षण (Digital education) आणि डिजिटल लर्निंग (Digital Learning) याबद्दलही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. नक्की विद्यार्थ्यांसाठी आणि रोजगार नसलेल्या उमेदवारांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

डिजिटल युनिव्हर्सिटी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2022 मध्ये शिक्षणाबाबत केलेल्या घोषणांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटी (Digital University) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. वन क्लास वन टीव्ही चॅनल 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली. पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत घोषणा करण्यात आली.

टीव्ही चॅनेलद्वारे शिक्षण

अर्थमंत्री सीतारणम यांनी शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशानं सुरू केलेले पूरक शिक्षण प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे (Educational Tv channel for students) इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा केली. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होतं. मात्र आता हे संख्या वाढवून 200 करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे.

अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महाग होण्याची शक्यता? एका क्लिकवर घ्या जाणून

60 लाख लोकांना रोजगार

देशात वाढत जाणारं बेरोजगारीचं प्रमाण लक्षात घेता. देशात 2022 आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारणम यांनी केली. त्यामुळे बेरोजगारांना थोडा दिलासा मिळाला. तसंच गरिबांसाठी 80 लाख घरे बांधली जातील. त्याचे बजेट 48000 कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केले जातील, ज्यात एक चिप असेल. परदेशात जाणार्‍यांना आराम मिळेल. पोस्ट ऑफिसमध्येही आता एटीएम उपलब्ध होणार असं सांगितलं.

डिजिटल कंटेन्टवर भर देणार

उच्च दर्जाची ई-सामग्री प्रदान करण्यासाठी उत्तम शिक्षक तयार केले जातील. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली. ज्यामध्ये ISTE मानकानुसार जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण दिले जाईल. देशात सध्या सुरू असलेले कौशल्य विकास कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. तरुणांना कार्यक्षम आणि पुन्हा कुशल बनवण्यासाठी डिजिटल देश ई-पोर्टल देखील सुरू केले जाईल. त्याचबरोबर सर्व राज्यांतील आयटीआय कौशल्य विकासाचे हे अभ्यासक्रम चालवले जातील अशीही घोषणा करण्यात आली होती.

First published:

Tags: Budget 2023, Modi Government, Nirmala Sitharaman