मुंबई, 29 ऑगस्ट: प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY - Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 46.25 कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळं गावाखेड्यातील अनेक लोकांनी बँकामध्ये आपली खाती उघडली आहेत. अनेक वर्षांपासून ज्या लोकांचा आणि बँकांचा दूर दूरपर्यंत संबधही नव्हता, असे अनेक नागरिक प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून बँकाशी जोडले गेले.
देशातील सर्व घटकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणं हा जन धन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मदतीनं केंद्र सरकारनं कोरोना महामारीच्या काळात गरिबांना पाठवलेली आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधीसह इतर योजनांतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. खेड्यापाड्यातील सावकार आणि सावकारांच्या जाळ्यात अडकलेल्या गरिबांना वाचवण्याचं कामही प्रधानमंत्री जन धन योजनेनं केलं आहे. आता सरकारनं गरिबांना दिलेली आर्थिक मदत मध्यस्थांकडे न जाता थेट त्यांच्या बँक खात्यात येते.
पंतप्रधान जन धन योजनेतील उपलब्ध सुविधा-
हेही वाचा- Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.