अर्थसंकल्पावर काय म्हणाले मुख्यमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात. काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची घोर निराशा या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेलं अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिलं गेल्याचं दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाइनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले.गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ!ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरु आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर! #JanJanKaBudget
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, CM, Udhav thackarey