जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'चांगलाच पाहुणचार घेऊ', शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा रवी राणांना थेट इशारा

'चांगलाच पाहुणचार घेऊ', शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा रवी राणांना थेट इशारा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलडाणा, 21 एप्रिल : अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीस म्हणण्याचा चंग बांधला आहे. पण, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी तिथे जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहूणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी थेट आमदार रवी राणा यांना उघडपणे धमकीच दिली आहे. ‘अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत. राणा कुटुंब निवडून आले राष्ट्रवादीच्या भरवश्यावर आता चमचेगिरी करत आहे  भाजपची. असे भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत, जसे राज ठाकरे, नारायण राणे, किरीट सॊमय्या व आता हे राणा कुटुंब हे सर्व ते आहेत, अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली. तसंच, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मातोश्रीवर जाण्याची भाषा केली होती ते कधीच तिथे पोहोचू शकले नाहीत तर हे टपरु राणा कुटुंब कसे पोहचतील. ‘मातोश्री’ला शिवसैनिकाचं सुरक्षेचं कवच कुंडले आहे की कोणीही तिथे पोहोचू शकणार नाही. हे जातील तर चांगला पाहूणचार करण्यात येईल’ असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे.   मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार दरम्यान, आमदार रवी राणा  यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्यासाठी अखेर तारीख जाहीर केली आहे. 22 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला. आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसाचे वाचन करावे अन्यथा मी व नवनीत राणा ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला होता. रवी राणा यांच्या इशाऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात