कणकवली, 1 फेब्रुवारी : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मोठा झटका बसला आहे. पोलिसांनी (Sindhudurg Police) नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची हालचाल सुरू केली असता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अटकाव केला. त्यावेळी जोरदार बाचाबाची झाली. कोर्टाबाहेरचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने (Sindhudurg Sessions Court) त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे. या प्रकरणाची सुनावणी पार पाडल्यानंतर कोर्टाबाहेर चांगल्याच घडामोडी घडल्या. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणेयांनी पोलिसांना अडवलं.
जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणेंना धक्का, कोर्टाबाहेर निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची pic.twitter.com/S9b2nwNAF1
— News18Lokmat (@News18lokmat) February 1, 2022
यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले. खरंतर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. ते आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टाबाहेर पडले आणि गाडीत बसले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांचा मोठा ताफा आजूबाजूला जमा झालेला बघायला मिळाला. पोलीस नितेश राणे यांना आता अटक करतील, अशी शक्यता असताना नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे धावून आले. त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, असं निलेश राणे ठामपणे म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर तीच भूमिका मांडली. त्यामुळे अखेर पोलिसांनी नितेश राणे यांच्या गाडीला जाऊ दिलं. ‘नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस योग्य तो निर्णय घेतील’, सरकारी वकिलांची भूमिका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस योग्य तो निर्णय घेतील. पोलीस परत एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि आज आलेल्या ऑर्डरचा विचार करतील. त्याप्रमाणे जे सार निघेल, त्यांना सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली मुदत संपली आहे, असं वाटलं तर अटक होईल. अटक करायची का? याबाबत पोलीस निर्णय घेतील. त्याबाबत मी बोलू शकत नाही. त्यांना कधी, कुठे अटक करायची ते पोलीस ठरवतील. आता अर्ज नामंजूर झाला म्हणजे अटकच करा, असं आम्ही म्हणणार नाही. आमच्या म्हणण्याबाबत ते तसंही कोर्टाच्या कस्टडीत गेलेले आहेत. आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या कस्टडीत ते मोकळे फिरत आहे. आम्हाला आता कोर्टाचा जो अहवाल येईल तो अयोग्य वाटला तर आम्ही त्याला आव्हान देऊ,” अशी प्रतिक्रिया सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. नेमकं प्रकरण काय? सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली होती. त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजर होत आपला जामीन अर्ज दाखल केला होता.

)







