मुंबई, 06 डिसेंबर : 'कोकणी माणूस हा अतिशय सरळ आणि निर्मळ आहे. कोकणातील आंबा सर्वाधिक गोड आहे की माणूस. पण जर एखाद्याशी पंगा घेतला तर सोडत नाही. कोकणात एकही प्रदूषणकारी प्रकल्प आम्ही आणणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प आणणारच असं ठामपणे सांगितलं.
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असता फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबद्दल रोखठोक भूमिका मांडली.
('साहेबांच्या पाठीवरील वळ पाहून सगळेच हळहळले,' सुप्रिया सुळेंची बेळगाव लढ्याबद्दल पोस्ट)
'मी मुख्यमंत्री असताना कोकणासाठी अनेक योजना सुरू केल्या. पण अडीच वर्षात या सर्व योजना बंद झाला पण मला आश्चर्य याचे वाटते की, ज्यांना कोकणाने भरभरून दिले त्यांच्या नेतृत्वात कोकणावर अन्याय झाला, असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
'पण चिंता करू नका आता कोकणाचे सुपुत्र मुख्यमंत्री आहेत आणि मी अर्थमंत्री आहे त्यामुळे कोकणचा विकास होईल' असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.
(महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टातून मोठी बातमी, शिवसेनेची मागणी फेटाळली)
'पाच हजार एकर ग्रीनरी त्याच कॅम्पसमध्ये होईल अशी आम्ही रिफायनरी आणत आहोत. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने सांगितले. यांना कोकण मागास ठेवून राजकारण करायचे आहे. पण आम्ही कोकणाचा विकास करणार आहोत. नऊरत्नाची खाण असलेल्या कोकण भूमिका मी वंदन करतोय. कोकणचे सुपुत्र ज्यांना म्हणता येईल असे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. कोकणाचे खरे दर्शन या महोत्सवानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा मूळ उद्देश हा कोकणचा विकास हा आहे. हा महोत्सव आयोजित करून विविध संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला' असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news