जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनाचे उमेदवार राजन साळवी यांची विजयाची हॅट्रिक!

शिवसेनाचे उमेदवार राजन साळवी यांची विजयाची हॅट्रिक!

शिवसेनाचे उमेदवार राजन साळवी यांची विजयाची हॅट्रिक!

लांजा राजापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा विजय झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    राजापूर, 24 ऑक्टोबर: लांजा राजापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा विजय झाला आहे. याआधी राजापूर मतदारसंघातून राजन सावळी यांनी दोनवेळा विजय मिळवला होता. यंदा पुन्हा एकदा शिवसेनेनं आपला गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना जनतेनं बुहमतानं विजयी केलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी फुलं, गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. साळवी आणि परिणामी सेनेचा राजापूर मतदारसंघावर पगडा भारी आहे. रत्नागिरीत काँग्रेसच्या वाट्याला एकच मतदारसंघ आला तो म्हणजे राजापूर. इथे सेनेचे उमेदवार राजन साळवी विरुद्ध अविनाश लाड विरुद्ध मनसे कडून अविनाश सोंडाळकर अशी तिरंगी लढत होती. राजापूर मतदारसंघाच दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे या मतदारसंघाची जास्त चर्चा आहे. जैतापूर आणि नाणार रिफायनरी. जैतापूर प्रकल्पावेळी राजन साळवी यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी जयतापूरवर निवडणूक जिंकली होती. मात्र आता साळवींसाठी नाणार रिफायनरी प्रकल्प मतांच्या दृष्टीनं घातक ठरणार का पाहावं लागणार आहे. नाणार रिफायनरीला विरोध केल्यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय बंड सुरू झालं आहे. त्यामुळे राजन साळवींना स्वपक्षातील कार्यकर्त्यांचा सामना करावा लागणार आहे. राजन साळवी 2009 आणि त्यानंतर 2014 रोजी राजापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. पहिल्यांदा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणि त्यानंतर नाणार रिफायनरी विरोधातील बंड यामुळे राजन साळवी प्रकाशझोतात आले. पण प्रकल्पांच्या विरोधात बंड करणाऱ्या राजन साळवींना मात्र त्यांच्याच पक्षातील शिवसैनिकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं. असं असलं तरीही जनतेनं राजन साळवी यांच्या पारड्या बहुमत टाकलं असल्यामुळे लांजा राजापूर मतदारसंघात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 2014 ची विधानसभेची परिस्थिती मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एकूण जागा - 288 भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी - 41 गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला. LIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर!

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात