मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये हाहाकार! अनेक घरे पाण्याखाली; हजारो नागरिक अडकले, मदतीसाठी आक्रोश

VIDEO: मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये हाहाकार! अनेक घरे पाण्याखाली; हजारो नागरिक अडकले, मदतीसाठी आक्रोश

चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे.

चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे.

चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे.

चिपळूण, 22 जुलै: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला (Vashisht River) पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.

अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. घरे तसेच इमारतींचे तळमजले हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे. चिपळुणात जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत त्यामुळे मदतीचे मार्गही बंद झाले आहेत. 2005 नंतर प्रथमच अशा प्रकारे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.

नागरिक घरांत अडकून पडले आहेत. शहराचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचा मदतीसाठी आक्रोश सुरू आहे. खासदार विनायक राऊत यांनीही मदतीसाठी नेव्हीला पाचारण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्याही कोकणात रवाना झाल्या आहेत.

PHOTOS: मुसळधार पावसाने बदलापुरात पूरस्थिती! इमारतींचा तळमजला पाण्याखाली; गाड्याही पाण्यात

चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे महाड शहर संपूर्ण जलमय झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 165.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माथेरान येथे सर्वाधिक 331 मिमी तर कर्जत 321 मिमी पावसाची नोंद झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीला पूर आल्याने खेड मधील खाडीपट्टा विभागातील अलसुरे मोहल्ल्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मोहल्ल्यात जवळपास 120 हून अधिक लोक अडकले आहेत. या गावात जाणारे सगळे मार्ग बंद झाल्याने गावात मदत करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

First published:

Tags: Chiplun, Maharashtra, Mumbai, Rain, Ratnagiri