प्रतिनिधी अंकुर शर्मा दंतेवाडा : छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथे नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रात सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. नक्षलवादी स्थानिक लोकांचे शोषण करत असून त्यांच्यासाठी समस्या निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला. बुधवारी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर रोडवर जिल्हा राखीव रक्षक (DRG) जवानांवर झालेल्या हल्ल्यावरून असं दिसतंय की या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
शोध मोहिमेत कोणतीही SOP पाळली गेली नाही अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास वर्षभराच्या शांततेनंतर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या या IED स्फोटात 10 DRG जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. Dantewada Naxalite Attack : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वाहनाच्या चिंधड्या; घटनास्थळाचे पहिले PHOTO प्रोटोकॉलनुसार, ऑपरेशन दरम्यान इंटेलिजन्स इनपुट मिळाल्यानंतर आणि मार्गाची कसून तपासणी केल्यानंतरच सुरक्षा दल पुढे जाऊ शकतात. काहीवेळा सुरक्षा दल रोड ओपनिंग पार्टी (आरओपी) चीही मदत घेतात. रस्त्यावर कोणताही धोका नाही हे समजल्यावरच जवानांची गाडी पुढे जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्तहेरांनी रस्त्यावर कोणता धोका आहे की नाही याची माहिती घेतली नाही. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी हे जवान मुख्यालयाकडे निघाले होते. मुख्यालयाकडे जात असतानाच अरणपूर इथे IED चा मोठा स्फोट झाला आणि जवानांचा मृत्यू झाला.
व्हॉट्सअॅपवर मुलींचे व्हायचे व्यवहार, एक दिवस पोलिसांनाच आला मेसेज अन्…सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीआरजी वाहन आधीच माओवाद्यांच्या रडारवर असल्याचीही माहिती मिळाली आहे. ताफ्याच्या मार्गावर आणि हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. जवानांनीही आपला मार्ग बदलला नाही, ही चूक टाळली असती तर अनर्थ टाळता आला असता असंही सांगितलं जात आहे. याआधी नक्षलवाद्यांनी स्थानिक नागरिकांना पत्र लिहून नेत्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.