शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आला आहे. त्यामुळे फक्त शिवसेनेला (shivsena) नाही, तर याचा फटका राज्यातील महाविकास आघाडी सरकारलासुद्धा बसू शकतो. दरम्यान, शिवसेना पक्षात असं बंड पुकारण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी शिवसेना सोडली आहे. कोण आहेत ते नेते? त्यांनी शिवसेना का सोडली, हे आज आपण जाणून घेणार आहोत. 1991 साली शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून छगन भुजबळ यांनी राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली होती. तर 2005 मध्ये नारायण राणे यांनी देखील 10 आमदारांसह शिवसेना सोडली होती. आता एकनाथ शिंदे देखील त्याच मार्गावर दिसत आहेत. मात्र, भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची तादक जास्त समजली जाते. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असेल.
1991 साली शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून छगन भुजबळ यांनी राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली होती. तर 2005 मध्ये नारायण राणे यांनी देखील 10 आमदारांसह शिवसेना सोडली होती. आता एकनाथ शिंदे देखील त्याच मार्गावर दिसत आहेत. मात्र, भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची तादक जास्त समजली जाते. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असेल.
त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले. मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं, असं मानलं जातं.
मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले. मात्र, याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले. 2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती. पण त्यावेळेस शिवसेनेचा कोणताही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहीला नाही. या प्रसंगापासून राणे शिवसेनेपासून दुरावण्याचा वेग वाढला. अखेर 2005 मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाराणय राणे यांच्यासोबत त्यावेळी 10 आमदारांनी पक्ष सोडला होता.
राज ठाकरे- राज ठाकरे हे शिवसेना हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. बाळासाहेबांसारखीच आक्रमक भाषणशैलीमुळे राज ठाकरे राज्यभर प्रसिद्ध होते. राज ठाकरेंनी युवासेनेचा प्रसार केला. राज ठाकरे पूर्णवेळ राजकारणात सक्रीय होते. मात्र पुढे उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील आगमणानंतर आपसूकच राज ठाकरेंना बाजूला ढकलल्याची भावना निर्माण झाली .
नाराजीतून त्यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेला रामराम ठोकून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला. या पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणूकीत 13 आमदार निवडून आणले. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी मनसे आता हिंदुत्त्वाच्या मुद्दा पुढं केलं आहे.
एकनाथ शिंदे गेले तर मोठं खिंडार.. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर शिंदे यांची चांगलीच पकड आहे.
शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे खासदार आहेत. त्यामुळे भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी यशस्वी झाली तर शिवसेनेतील सर्वात मोठी बंडखोरी ठरेल.