जालना, 10 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी राज्यपाल मानत नाही. राज्यपालपदाचा मी आदर करतो. पण कोश्यारी याचा आदर करणार नाही. महाराष्ट्राचे दैवत आहे, त्यांचा जो अपमान करतो, तरी त्यांना आम्ही वाकून नमस्कार करायचा, हे आम्हाला चालणार नाही', असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
जालन्यात मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी राज्यपाल मानत नाही. राज्यपालपदाचा मी आदर करतो. पण कोश्यारी याचा आदर करणार नाही. महाराष्ट्राचे दैवत आहे, त्यांचा जो अपमान करतोय, तरी त्यांना आम्ही वाकून नमस्कार करायचा, हे आम्हाला चालणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
'कुणी तरी शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ कोकणात असल्याचं सांगत आहे. लहानपणापासून आम्ही जे शिकत आलो आहे ते सत्य आहे. ते सत्य जर तुम्ही पुसून नवे आदर्श ठरवणार असाल तर कुशाल करा,पण आमच्या दैवता पुढे होणार नाही. इकडे आला तर शिवरायांना मुजरा केलाच पाहिजे, आदर राखला पाहिजे. आज मंत्रिमंडळात एका महिलेला शिवी देणार मंत्री आहे. मी होतो तेव्हा एका मंत्र्याला काढून टाकले होते. नाहीतर काय अर्थ आहे, एकीकडे शिवरायांवर बोलायचं आणि दुसरीकडे अशा मंत्र्यांना पोसायचे. त्या मंत्र्याला काढून टाकायला पाहिजे होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.
(धनंजय मुंडेंनी डोक्याला लावला हात, पैसे मागण्याच्या फोनमुळे पोलिसांकडे घेतली धाव)
'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. आता उद्या राज्यपालांच्या विधानावर पांघरून घालण्याचे काम केले जाईल. कसे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. मग आम्हाला टोमणे मारतील. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे, त्यावर ते बोलतील. माझी विनंती तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही देशाचे पालक आहात. हे रेडे वेद बिद काही बोलणार नाही, ते फक्त खोका खोका बोलतील. जरूर आमचे कान टोचावे, तुमचे अधिकार आहे. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जो वाद पेटला आहे. महाराष्ट्र व्याप्त जमीन आहे, त्याबद्दल सडकून बोललं पाहिजे. कर्नाटकच्या भूमिकेवर तुम्ही बोललं पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली.
समृद्धी महामार्ग झाला तो चांगला झाला आहे. हे रास्त होत राहतील. पण जर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अडकलेला असेल. शिवसेनेची मागणी नेहमी राहिली आहे. शेवटी बेळगावमधील मराठी माणसावर जो अत्याचार होतोय. मराठी बांधवावर अत्याचार होत आहे, त्यांना न्याय कधी देणार आहे. आपण कधी कानडी भाषेवर बोललो नाही. पण कोणीही यावं आणि सोलापूर मागावं, उद्या आमच्या पंढरपूरचा विठ्ठलावर हक्क सांगाल. मला अपेक्षा आहे, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक वादावर भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.
(कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उघडपणे दिला इशारा, शिंदे गटाचे मंत्री म्हणाले...)
'हिटलर छळून छळून मारतो. मतांची किंमत खोक्यांमध्ये नाही तर भावनांमध्ये आहे. तुम्ही दिलेलं मत तुम्हाला कळतंय का कुठं जाणार आहे. एकदा जाहीर करा देशातली लोकशाही संपली. आपल्या देशात लोकशाही खरच रुजलीये का? तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं आज लोकशाही टिकवायचं आहे, देशाचे कायदेमंत्री न्यायमूर्तींवर बोट दाखवताय. पंतप्रधान जर न्यायमूर्ती नेमण्याचं काम करत असाल तर न्यायालय रद्द करा. जीवघेणी लोकशाहीत अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.