जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उन्हाळ्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण

उन्हाळ्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण

उन्हाळ्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण

तुमच्या घरात किंवा कार्यालयात सोबतच्या स्त्रिया “किती उकडतंय, किती गरम होतंय, पंख्याचा वारा लागतच नाही, एसी लावा, एसीचे तापमान कमी करा.” वगैरे तक्रारी करत असतील तर त्यांमागे तथ्य आहे, स्त्रिया उगाच तसं बोलत नसतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल : सभोवतालच्या उष्ण तापमानाचा आरोग्यावर होणारा बरा-वाईट परिणाम अभ्यासताना असे दिसून येते की, पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री-शरीरावर उष्ण तापमान अधिक विपरित परिणाम करते. मुलुंड येथील शाश्वत आयुर्वेदिक क्लिनिकच्या वैद्य अश्विन सावंत यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आज जाणून घेऊया स्त्रियांना जास्त गरम होण्याची काय काय कारणे आहेत. स्त्रियांवर उच्च तापमानाचा अधिक वाईट परिणाम का होतो, त्याचे स्पष्टीकरण देताना जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो असा. पुरुष आणि स्त्रियांच्या पेहरावामध्ये-कपड्यामध्ये असणारा फ़रक. हे स्त्रियांच्या शरीरावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातही भारतासारख्या ज्या देशांमध्ये स्त्री-शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे घालण्याचा रिवाज आहे. तिथल्या स्त्रियांनी एकावर एक घातलेले अंगावरचे कपडे, त्यातही अजिबात व्हेंटीलेशन होऊ न देणारी जीन्स आणि त्याखालील अन्तर्वस्त्रे यांमुळे शरीराला वारा लागत नाही. त्यामुळे आतली उष्णता आतल्या आतच वाढत जाते. संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यांमुळे बाह्य त्वचेला घाम निर्माण करून शरीराला थंड करण्याचा उपाय सुद्धा करता येत नाही. त्यात पुन्हा स्वयंपाकघरात उष्णतेजवळ सरासरी दोन ते चार तास काम केल्यामुळे वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्त्रियांचे शरीर अधिकच उष्ण होत जाते. जे विविध उष्णता जन्य विकारांना कारणीभूत ठरू शकते. उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते, यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. शास्त्रीय कारणाचा विचार करता स्त्रियांच्या शरीरामध्ये त्वचेखाली असणारी अधिकची चरबी त्याला जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्वचेखाली अधिक मात्रेमध्ये असणार्‍या चरबीमुळे स्त्री-शरीराला सौष्ठव आणि सौंदर्य प्राप्त होते. हीच चरबी स्त्रियांच्या शरीराला अधिक ऊब देते. ऊब देण्याचा चरबीचा हा गुण हिवाळ्यात फायदेशीर सिद्ध होत असला, तरी उन्हाळ्यात मात्र शरीराला सहजी थंड होऊ देत नाही आणि स्त्री-शरीर उन्हाळ्यामध्ये तुलनेने अधिक गरम राहते. एकंदरच उन्हाळ्याचा आणि उष्ण तापमानाचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम होत असेल, याची पुरुषांना कल्पना सुद्धा करता येणार नाही. मात्र त्याची कल्पना करुन त्यामागील कारणे ओळखून त्यामध्ये बदल व्हायला हवा. संस्कृतीला धक्का न लावता स्त्रियांना हवेशीर कपडे कसे मिळतील याची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातली उष्णता कशी वाहून जाईल आणि स्वयंपाकघर कसे हवेशीर होईल. यासाठी प्रयत्न व्हायला हवे. महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी घरातल्या प्रत्येक सदस्याने उचलायला हवी. घरातल्या सर्वांच्या उदरभरणासाठी अन्न तयार करणे, ही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही. स्त्रियांनी सुद्धा पाणी आणि अन्य द्रवपदार्थ पित राहावं. केवळ दहा बारा ग्लास पाणी पिऊन चालत नाही. शरीरातून घटलेले क्षार व उर्जा मिळायला हवी. त्यासाठी दिवसातून निदान एक शहाळ्याचे पाणी प्यावे. पाणी आणि थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करावे. जसे केळी, कलिंगड, काकडी, टरबूज, द्राक्ष, पेरू, वगैरे दिवसातून एक तरी फळांचा रस प्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात