फ्रिजच्या पाण्याने तहान जाते पण, माठातल्या पाण्या इतकं ते पाणी आरोग्यासाठी पायदेशीर नसतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी पिण्याने पुरूषांना तर जास्तच फायदा होतो.
नैसर्गिक फिल्टर (Natural filter) तज्ज्ञांच्या मते, 4 तासांपेक्षा जास्त काळ माठामध्ये पाणी राहिलं तर, ते नैसर्गिकरित्या शुद्ध होतं. कारण मातीमध्ये नैसर्गिकरित्या दूषित घटक शोषून घेण्याची क्षमता असते.
वजन कमी होतं पुर्वीच्या काळापासून माठातल पाणी आपण पितो. माठातल्या पाण्याने आपलं मेटबॉलिजम सुधारतं. त्यामुठे शरीरातली चरबी वितळते.
पुरुषांना फायदा-फ्रिजमध्ये ठेवलेलं प्लास्टीकच्या बाटलीतलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर (Testosterone Hormone) वाईट परिणाम करतं. माठातलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोन संतुलनात (Balance) मदत करतं.
श्वसनाचे आजार कोरोनामुळे आपल्या श्वसनप्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळा असला तरी, फ्रिजचं पाणी पिण्याने त्रास आणखीन वाढू शकतो. पण माठाचं पाणी प्यायल्याने खोकला,घसा खवखवणं, सूज यासारखे त्रास होत नाहीत.
सनस्ट्रोक पासून बचाव भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उन्हाळ्यात पारा वाढला की सनस्ट्रोक होण्याची भिती वाढते. अनेक ठिकाणी तापमान 40 पार जातं. अशा वेळी माठातलं पाणी थंडावाही देत आणि फ्रिजच्या पाण्याने होणारा कोणताही त्रास होत नाही.
ऍसिडिटीचा त्रास प्राकृतिकरित्या माणसाचं शरीर ऍसिडीक असतं तर, माती प्राकृतिकरित्या अल्कलाईन असते. माठाचं पाणी प्यायल्याने शरीरात पीएच लेव्हल संतुलीत राहते. त्यामुळे ऍसिडीटी आणि पोटासंबंधी आजार कमी होतात.