नातेवाइकांशी भांडण करू नका : चाणक्य नीतीनुसार, जवळचे नातेवाईक अनेकदा आपलं चांगलं-वाईट समजून घेतात. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांशी भांडण करणे म्हणजे आपला एखादा हितचिंतक गमावण्यासारखे आहे. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप तर होतोच पण भविष्यात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे कुटुंबीयही तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.
मुर्ख लोकांशी वाद घालू नका : आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी भांडण करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रकार आहे. अशी माणसे आपले मत दुसऱ्याला सांगताना नेहमीच वाद घालू लागतात, त्यांच्याशी भांडण करून तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता आणि मूडही खराब करता. अशा परिस्थितीत मूर्ख लोकांशी वाद न केलेलाच बरा.
मित्रांशी भांडू नका : मैत्रीचे नाते हे जीवनातील खास नाते आहे. हसण्या-विनोद करण्यापासून गुपिते शेअर करण्यापर्यंत मैत्री आपल्याला प्रत्येक पावलावर साथ देते. काही वादातून आपला सर्वात चांगला मित्र गमावणं वाईट आहे. तुम्ही मित्रांशी भांडण करून तुमचा सर्वात चांगला मित्र गमावता आणि तुम्ही विश्वासार्ह नातेसंबंधापासून देखील दूर जाता आणि भविष्यात जेव्हा अडचणी उद्भवतात तेव्हा तुम्हाला तुमच्या कृतीबद्दल पश्चाताप होऊ लागतो.
शिक्षकाशी भांडू नका : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. एक चांगला शिक्षक जीवनात तुमचा मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र, काही लोक अनेकदा रागावतात आणि गुरूबद्दल वाईट बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, परंतु असे केल्याने तुम्ही स्वतःला गुरूपासून तर दूरच घालवता पण ज्ञानापासून (सूचना : येथे दिलेली माहिती चाणक्य नीतीशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)