जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / कोण होते फिरोज गांधी? ज्यांच्या आडनावावरुन सुरुय वाद; भ्रष्टाचाराविरुद्ध काँग्रेसलाच भिडले

कोण होते फिरोज गांधी? ज्यांच्या आडनावावरुन सुरुय वाद; भ्रष्टाचाराविरुद्ध काँग्रेसलाच भिडले

कोण होते फिरोज गांधी?

कोण होते फिरोज गांधी?

Works of Feroze Gandhi - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे वडील आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी हे संसदपटू आणि पत्रकार होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिवादनावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न उपस्थित केला की गांधी कुटुंब देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आडनाव का वापरत नाही. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पलटवार करत म्हटले की, देशातील बहुतांश लोक त्यांच्या वडिलांचे आडनाव वापरतात. म्हणूनच आम्ही आमच्या वडिलांचे आणि आजोबांचे आडनाव देखील वापरतो. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी यांनी त्यांचे पारशी वडील जहांगीर फरदून घांडी यांचे आडनाव सोडून गांधी आडनाव धारण केले याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. सर्वप्रथम, फिरोज घांडी यांना गांधी हे आडनाव कसे पडले हे जाणून घेऊया? पारशी धर्मात घांडी हे फिरोज यांचे आडनाव किंवा जातीचे नाव असल्याचे अनेक पुस्तके सांगतात. स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतल्यानंतर गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी ते बदलून गांधी असे केले. त्याचवेळी इंदिरा गांधींच्या काकू कृष्णा हाथिसिंग यांनी त्यांच्या ‘इंदू से प्रधान मंत्री’ या पुस्तकाच्या नवव्या प्रकरणात फिरोज यांच्या आडनावावर प्रकाश टाकला आहे. फिरोज यांचे आडनाव गांधी असल्याचे त्यांनी लिहिले. याला अपभ्रंश असेही म्हटले जात असे. हे कुटुंबाच्या व्यवसायाशी संबंधित आहे. मोदी, पानसारी किंवा गंधी म्हणून काम करणाऱ्यांना गांधी म्हणतात, असे त्यांनी लिहिले. मुंदडा घोटाळा उघड माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई होण्यापूर्वी फिरोज गांधी हे स्वातंत्र्यसैनिक होते. व्यवसायाने पत्रकार असलेल्या फिरोज गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर रायबरेलीतून निवडणूक लढवली आणि जिंकून संसदेत पोहोचले. त्यावेळी संसदेत काँग्रेस सरकारसमोर विरोधक नव्हता. पण, जेव्हा-जेव्हा फिरोज गांधी असहमत होते, तेव्हा ते सरकार आणि काँग्रेसविरोधात आवाज उठवत असत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 1958 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिले भ्रष्टाचार प्रकरण असलेल्या ‘मुंडडा घोटाळ्या’वर आवाज उठवला होता. एलआयसीने कोलकाता येथील हरिदास मुंदडा यांच्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेत त्यांचा फायदा करून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकार आणि एलआयसीने विरोध का केला नाही असा सवालही केला. Feroze Gandhi, Rahul Gandhi, Indira Gandhi, Rajiv Gandhi, PM Narendra Modi, Mundhra Scandal, Jeep Scam, Jawahar Lal Nehru, Surname Gandhi Controversy, Career of Feroze Gandhi, Congress, BJP, फिरोज गांधी, राहुल गांधी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मूंदड़ा घोटाला, मुंद्रा घोटाला, जीप घोटाला, गांधी उपनाम विवाद, कांग्रेस, बीजेपी, संसद सत्र अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यावर स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. हे प्रकरण इतके वाढले की या प्रकरणात पंडित जवाहरलाल नेहरूंचेही नाव पुढे आले. त्यामुळे सासरे आणि जावई यांच्यातील संबंधही बिघडले होते. नंतर पं. नेहरूंनी याची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम सी छागला यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. लोकांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एचडीएफसी बँकेचे संस्थापक हसमुख ठाकोरदास पारेख यांनी आयोगाला सांगितले की, हरिदास यांनी या कंपन्यांचे शेअर्स चढ्या भावाने विकून नफा कमावला. त्यामुळे या कंपन्यांच्या एलआयसीने खरेदी केलेल्या शेअर्सचे 50 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीटी कृष्णमाचारी यांना राजीनामा द्यावा लागला होता. वाचा - आघाडीला धक्का? ठाकरेंचे मित्रपक्ष वंचितचा चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा; तर कसब्यात.. पत्रकारांसाठी मोठे काम फिरोज गांधी यांनी मुंदडा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी 3 वर्षांपूर्वी दालमिया जैन समूहातील आर्थिक अनियमितताही उघड केली होती. त्यांच्या डीजे ग्रुपमधील आर्थिक अनियमिततेमुळे आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. याशिवाय त्यांनी संसदेत खाजगी सदस्य विधेयक मांडले जेणेकरून कोणताही पत्रकार संसदेच्या कामकाजाचे वार्तांकन करू शकेल. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यानंतर इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. फिरोज गांधींचे स्पष्टवक्तेपणा अनेकांना आवडला नाही आणि इंदिरा गांधी त्यांच्या वडिलांच्या राजकीय जीवनात गुंतत गेल्या. Feroze Gandhi, Rahul Gandhi, Indira Gandhi, Rajiv Gandhi, PM Narendra Modi, Mundhra Scandal, Jeep Scam, Jawahar Lal Nehru, Surname Gandhi Controversy, Career of Feroze Gandhi, Congress, BJP, फिरोज गांधी, राहुल गांधी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मूंदड़ा घोटाला, मुंद्रा घोटाला, जीप घोटाला, गांधी उपनाम विवाद, कांग्रेस, बीजेपी, संसद सत्र इंदिरा गांधींना फॅसिस्ट का म्हटले गेले? वैयक्तिक जीवनाव्यतिरिक्त फिरोज गांधी त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांच्या राजकीय विचारसरणीशीही असहमत होते. लोकशाही मूल्ये आणि संघराज्यवादाचे समर्थन करणाऱ्या फिरोज गांधींना इंदिरा गांधींची हुकूमशाही वृत्ती आवडली नाही. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले. 1959 मध्ये केरळमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार बरखास्त करण्याचा निर्णय केंद्राने घेतला तेव्हा दोघांमधील कटुता सर्वात जास्त आली. त्यावेळी पंडित नेहरू हयात होते आणि इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. केरळ तेव्हा EMS नंबूदिरिपाद सरकारच्या अंतर्गत होते आणि त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली. याला मोठा विरोध झाला आणि केंद्राने त्यांचे सरकार पाडले. मग फिरोज हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी इंदिरा गांधींना ‘फॅसिस्ट’ म्हटले होते. नाश्त्याच्या टेबलावर काय झाले? स्वीडिश पत्रकार बर्टील फॉक यांनी त्यांच्या ‘फिरोज द फॉरगॉटन गांधी’ या पुस्तकात लिहिले आहे की, प्रसिद्ध राजकीय पत्रकार जनार्दन ठाकूर यांच्या मते, तीन मूर्ती येथे नाश्ता करताना इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात केरळच्या मुद्द्यावरून वाद झाला. हे अजिबात योग्य नाही, असे फिरोज गांधी म्हणाले. तुम्ही लोकांना धमकावत आहात. तुम्ही फॅसिस्ट आहात. यावर संतप्त झालेल्या इंदिरा गांधी म्हणाल्या की, तुम्ही मला फॅसिस्ट म्हटले. मी हे सहन करणार नाही. त्यानंतर त्या खोली सोडून गेल्या. या दरम्यान पं.नेहरू हा वाद शांतपणे पाहत राहिले. पत्रकार कुमी कपूर यांनी त्यांच्या ‘द इमर्जन्सी’ या पुस्तकात लिहिले आहे की, संजय गांधी त्यांचे वडील फिरोज गांधी यांच्याकडे झुकत होते. वडिलांकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांना वाटले. Feroze Gandhi, Rahul Gandhi, Indira Gandhi, Rajiv Gandhi, PM Narendra Modi, Mundhra Scandal, Jeep Scam, Jawahar Lal Nehru, Surname Gandhi Controversy, Career of Feroze Gandhi, Congress, BJP, फिरोज गांधी, राहुल गांधी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मूंदड़ा घोटाला, मुंद्रा घोटाला, जीप घोटाला, गांधी उपनाम विवाद, कांग्रेस, बीजेपी, संसद सत्र कसे झाले फिरोज गांधींचे अंतिम संस्कार? फिरोज गांधी यांचे 8 सप्टेंबर 1960 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात गीता, रामायण, कुराण आणि बायबलमधील उतारे वाचण्यात आले. पारशी धर्मगुरूंनीही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली. हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. राजीव गांधींनी दिवा लावला. त्यांच्या अस्थी संगमात विसर्जित केल्या, पण काही भाग दफन केला गेला. बर्टील फॉक आपल्या पुस्तकात लिहितात की, जिथे फिरोज गांधींच्या अस्थी पुरल्या होत्या, तिथे त्यांची कबरही बांधण्यात आली होती. ही समाधी आजही अलाहाबादमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात