जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / प्रियांका गांधी यांच्या मुक्कामामुळे युपी निवडणुकीत कबीर मठ चर्चेत? काय आहे या संप्रदायाचं महत्व?

प्रियांका गांधी यांच्या मुक्कामामुळे युपी निवडणुकीत कबीर मठ चर्चेत? काय आहे या संप्रदायाचं महत्व?

प्रियांका गांधी यांच्या मुक्कामामुळे युपी निवडणुकीत कबीर मठ चर्चेत? काय आहे या संप्रदायाचं महत्व?

प्रियांका गांधी मतदानापूर्वी तीन दिवस वाराणसीतील प्रसिद्ध कबीर मठात मुक्कामाला आहेत. कबीर मठातील त्यांच्या वास्तव्याबद्दल राजकीय अर्थ काढले जात आहेत. परंतु, कबीर मठ हा अतिशय प्रसिद्ध मठ आहे, जो केवळ प्राचीनच नाही तर देशभरातील कबीरपंथींसाठी तीर्थक्षेत्र आहे. हा कबीर मठ कसा आहे आणि कबीर पंथ काय आहे? चला जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनौ, 4 मार्च : वाराणसीचा कबीर मठ सध्या चर्चेत आला आहे. बनारसमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी 3 दिवस येथे मुक्कामी आहेत. त्यांचा इथं राहण्याला राजकीय अर्थ आहे. पण, कबीर मठाबद्दल बोलायचं झालं तर ते केवळ प्राचीनच नाही तर त्याला खूप महत्त्व देखील आहे. कंबीर पंथींसाठी हे त्यांचे पवित्र स्थान आहे. हा मठ लहरतारा येथे खूप विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे. या संकुलात अनेक मोठ्या इमारती, मंदिरे आणि स्मारके आहेत. केवळ प्रियंकाच नाही तर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इतर बडे नेते यापूर्वी येथे आले आहेत. गांधीजी येथे वारंवार येत असत. रवींद्रनाथ टागोर इथे येऊन राहायचे. हे काशीचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. बनारसमधील कबीरचौरा येथे संत कबीर यांनी आयुष्याचा बराच काळ वास्तव्य केले. हे त्यांचे कामाचे ठिकाण होते. इथेच त्यांनी आपल्या वाणीने लोकांना प्रभावित केले. हा मठ त्यांच्या शिकवणींचे, संदेशांचे आणि आठवणींचे केंद्र आहे. दरवर्षी कबीर जयंतीला देश-विदेशातून मोठ्या संख्येने अनुयायी येथे येतात. कबीर हे 15व्या शतकातील महान संत होते. खरे तर हा मठ एक मोठे आध्यात्मिक केंद्र तर आहेच, पण त्यांची वाणीही इथे ऐकू येते. लोक येथे येऊन त्यांच्या संदेशांचा अनुभव घेतात. कबीर मठात समाधी मंदिर, कबीर झोपडी, त्यांचा ओटा, बिजक मंदिर, नीरू टिळा, ग्रंथालय आणि अनेक स्मारके आहेत. संकुलातील मोठ्या आणि हिरव्यागार बागेत अनेक पुतळे आहेत. येथील वातावरण एक वेगळीच अनुभूती देते. कबीरांच्या शिष्यांनी सुरू केला पंथ कबीर हे भारतीय गूढ कवी आणि संत होते. हिंदी साहित्यातील भक्ती युगाचे ते प्रवर्तक होते. त्यांचा अलिप्त विचारसरणीवर विश्वास होता. त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. त्यानंतर कबीरांच्या शिष्यांनी त्यांच्या विचारधारेवर आधारित एक पंथ सुरू केला, ज्याला कबीर पंथ म्हणतात. बनारसमधील कबीरचौरा येथे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या नावाने एक मठही बांधला, जो काळानुसार वाढत गेला. देशभरातील सुमारे एक कोटी लोक या पंथाशी संबंधित असल्याचे मानले जाते. तरी हा संप्रदाय अनेक प्रवाहांमध्ये विभागला गेला आहे. संत कबीरांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी चार मुख्य शिष्यांवर दिली. हे चार शिष्य म्हणजे ‘चतुर्भुज’, ‘बांके जी’, ‘सहते जी’ आणि ‘धर्मदास’, ज्यांनी कबीरांच्या वचनांचा प्रसार करून एक वेगळ्या प्रकारचा समाज निर्माण व्हावा म्हणून देशभर फिरले. त्यांच्या पहिल्या तीन शिष्यांबद्दल फारसा तपशील नाही. पण, चौथा शिष्य धर्मदास यांनी कबीर पंथाची ‘धर्मदासी’ किंवा ‘छत्तीसगढ़ी’ शाखा स्थापन केली होती, जी सध्या देशातील सर्वात मजबूत कबीरपंथी शाखा आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनी हा संप्रदाय सुरू केला, असेही मानले जाते. औरंगजेबाचे पहिले प्रेम हिराबाई! जिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता मुघल सम्राट कबीरांचे काय विचार होते? ते हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांवर टीका करत होते. त्यांनी यज्ञ आणि सुंता निरर्थक ठरवले. मात्र, त्यांच्या या बोलण्याने त्यावेळी हिंदू आणि मुस्लिमांमध्येही प्रचंड नाराजी पसरली होती. त्यांना अनेकदा धमक्या आल्या. कबीर पंथी किती लोक आहेत? असे मानले जाते की देशातील एकूण 96 लाख लोक कबीरपंथी आहेत. त्यात मुस्लिमांची संख्या कमी आणि हिंदू मोठ्या संख्येने आहेत. यासोबतच बौद्ध आणि जैन धर्मासह इतर अनेक धर्माचे लोकही आहेत. कबीरपंथी कंठी घालतात, बीजक, रमणी इत्यादी ग्रंथांबद्दल आदरयुक्त भाव ठेवतात. गुरु हा सर्वांपेक्षा वरचा मानला जातो. सुरुवातीला तात्विक आणि नैतिक शिक्षणावर आधारित असलेला हा पंथ नंतर धार्मिक पंथात बदलला. कबीर पंथाच्या किती शाखा आहेत? कबीरपंथाच्या दोन प्रमुख शाखा सांगितल्या जातात. पहिल्या शाखेचे केंद्र ‘कबीरचौरा’ (काशी) आहे. ज्याची मगघरमध्ये उपशाखा आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. दुसरे मोठे केंद्र छत्तीसगड अंतर्गत येते, ज्याची स्थापना धर्मदासांनी केली होती. त्यांच्या अनेक शाखा आणि उपशाखा देखील नमूद केल्या आहेत. पुढे छत्तीसगढी शाखाही अनेक शाखांमध्ये विभागली गेली. ज्यामध्ये कबीरचौरा जगदीशपुरी, हरकेसर मठ, कबीर-निर्णय-मंदिर (बुऱ्हाणपूर) आणि लक्ष्मीपूर मठ यांचा समावेश आहे. ‘त्या’ घटनेने झाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पायाभरणी! कबीर पंथात कबीर यांना कसे मानले जाते? कबीरपंथी संघटनांनी कबीरांबद्दल अनेक पौराणिक कथा निर्माण केल्या आहेत. यातून त्यांनी कबीरांना अलौकिक रूप दिले. त्याच बरोबर त्यांनी जगाची निर्मिती, संहार, अशा अनेक कल्पना त्यांच्या ग्रंथात आणि साहित्यात केल्या आहेत. यातील बहुतांश कामे छत्तीसगड शाखेच्या अनुयायांनी केली होती. कबीर पंथाचे ग्रंथ काय आहेत? कबीर पंथाच्या छत्तीसगढ़ी शाखेने कबीरांवर अनेक ग्रंथ आणि रचना तयार केल्या. मात्र, यासोबतच कबीर जे काही बोलले होते, तेच मुळात गायब झाले. परिणामी हा पंथही सांप्रदायिकता, कर्मकांड आणि इतर दिखाऊपणात गुरफटून राहिला. कबीरचौरामध्ये काय आहे? असे मानले जाते की कबीर हे वाराणसीहून दूर कबीरचौरा येथे राहत होते. इथेच त्यांनी आपल्या वाणीने लोकांना तृत्प केले. त्यामुळे हे कबीरांचे मुख्य मंदिर आहे. येथे कबीरदासांचा मठ आणि मंदिर आहे, ज्यामध्ये त्यांचे चित्र ठेवलेले आहे. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात