नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान (F-16 Fighter Aircraft) पाडल्याबद्दल भारतीय हवाई दलातील (Indian Air Force) माजी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले. तसेच आर्मी सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. तर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. शहीद नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
भारतातील शौर्य पुरस्कारांचे ढोबळमानाने दोन विभाग केले जाऊ शकतात. यामध्ये एक स्वातंत्र्यपूर्व शौर्य पुरस्कार आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर शौर्य पुरस्कार. स्वातंत्र्यपूर्व शौर्य पुरस्कारांमध्ये इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, मिलिटरी क्रॉस इत्यादींचा समावेश होतो, तर स्वातंत्र्यानंतर अनेक पदके शौर्य पुरस्कारांमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये परमवीर चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र इत्यादींचा समावेश आहे.
ज्या सैनिकांनी जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण केले आणि शत्रूंचे हल्ले परतून लावले त्यांना हे पुरस्कार दिले जातात. यातील अनेक पदके देशाची सेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जातात. या पुरस्कारांमध्ये पदकासोबत भत्ताही दिला जातो. यापूर्वी, या भत्त्यात दिलेली मदत खूपच कमी होती, जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 2017 मध्ये वाढवली होती.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा 'वीर चक्र' पुरस्कारासाठी प्रस्ताव
महत्वाची पदकं
अशोक चक्र - अशोक चक्र हे शांततेचे परमवीर चक्र मानले जाते. म्हणजेच युद्धाव्यतिरिक्त शौर्य आणि धैर्यासाठी दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. याने ब्रिटिश जॉर्ज क्रॉस पुरस्काराची जागा घेतली. हा पुरस्कार मिळवणारे फ्लाइट लेफ्टनंट सुहास बिस्वास हे पहिले भारतीय होते. हा पुरस्कार 4 जानेवारी 1952 रोजी सुरू झाला. मग त्याला अशोक चक्र क्लास 1 म्हटले गेले. पुढे 1967 मध्ये ते अशोक चक्र म्हणून ओळखले जाऊ लागले. हे हिरव्या रिबनसह परिधान केले जाते, ज्यामध्ये भगवी पट्टी असते.
महाराष्ट्र पोलिसांचा गौरव, 3 जणांना शौर्यपदक बहाल
कीर्ती चक्र- कीर्ती चक्र हे भारताचे शांतताकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिक आणि नागरीकांना अपवादात्मक शौर्य किंवा प्रकट शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. 1952 मध्ये कीर्ती चक्राचे नाव अशोक चक्र वर्ग II असे करण्यात आले. नंतर 1967 मध्ये ते कीर्ती चक्र असे बदलण्यात आले. हे हिरव्या रिबनसह घातले जाते, परंतु यात दोन भगव्या पट्ट्या येतात. कीर्ती चक्र शौर्य आणि पराक्रमासाठी दिले जाते. शांततेच्या काळात दिलेले हे शौर्य पदक आहे.
शौर्य चक्र- शौर्य चक्र हे भारताचे शांतताकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिक आणि नागरीकांना अपवादात्मक शौर्य किंवा प्रकट शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. प्राधान्याने, हे कीर्ती चक्रानंतर येते. याचे पदक कांस्यपासून बनलेले आहे. कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अशोक चक्राचे दोन वर्ग आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.