मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘या’ कारणाने मोडलं होतं अभिषेक- करिश्माचं ठरलेलं लग्न; या जोडीची आजही होते चर्चा

‘या’ कारणाने मोडलं होतं अभिषेक- करिश्माचं ठरलेलं लग्न; या जोडीची आजही होते चर्चा

बॉलिवूडच्या दोन्ही मोठ्या कुटुंबानी हे लग्न करण्याचा घाट घातला होता. लग्न ठरल्याचं जाहीरही झालं होतं. पण त्यानंतर ते लग्न कधीच झालं नाही.

बॉलिवूडच्या दोन्ही मोठ्या कुटुंबानी हे लग्न करण्याचा घाट घातला होता. लग्न ठरल्याचं जाहीरही झालं होतं. पण त्यानंतर ते लग्न कधीच झालं नाही.

बॉलिवूडच्या दोन्ही मोठ्या कुटुंबानी हे लग्न करण्याचा घाट घातला होता. लग्न ठरल्याचं जाहीरही झालं होतं. पण त्यानंतर ते लग्न कधीच झालं नाही.

मुंबई 24 जून : बॉलिवूडमध्ये (Bollywood couples) अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या लग्नाच्या खूप चर्चा झाल्या पण ते लग्न मात्र कधीच होऊ शकलं नाही. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bacchan). दरम्यान बॉलिवूडच्या दोन्ही मोठ्या कुटुंबानी हे लग्न करण्याचा घाट घातला होता. लग्न ठरल्याचं जाहीरही झालं होतं. पण त्यानंतर ते लग्न कधीच झालं नाही.

तत्कालीन वृत्तांनुसार अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या 60 व्या वाढदिवशी करिश्मा आणि अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. तर तारीखही निश्चित करण्यात आली होती. पण नंतर हे लग्न होणार नसल्याचं समोर आलं. बॉलिवूडच्या दोन मोठ्या कुटुंबातील हे नात जुळता जुळता का राहीलं यावर अनेक चर्चा ही झाल्या होत्या. (Abhishek – Karishma engagement)

याचं मुख्य कारण त्यावेळी कधीच समोर येत नव्हतं. 2002 साली हे लग्न ठरंल होतं. पण हे लग्न मोडण्यामागे करिश्माची आई बबिता कपूर (Babita Kapoor) या असल्याचं समोर येत होतं. अभिषेक आणि करिश्माविषयी देखील अनेक बातम्या समोर येत होत्या. पण बबिता यांना कुठेतरी हे लग्न खटकत होतं. त्यांनी बच्चन कुटुंबासमोर काही प्रस्तावही ठेवले होते.

त्यावेळी करिश्माने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण अभिषेकने मात्र नुकतीच सुरुवात केली होती. तर अभिषेकचं करिअरही सेट झालं नव्हतं. याशिवाय एक काळ असाही होता जेव्हा बच्चन कुटुंबाला आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे बबिता यांनी बच्चन कुटुंबासमोर काही अटी ठेवल्या. त्यांनी बच्चन कुटुंबातील अभिषेकचा प्रॉपर्टीतील हिस्सा समोर ठेवायाला सांगीतला. मात्र बच्चन कुटुंबाला हे मान्य नव्हतं. आणि त्यानंतर हे लग्नं मोडलं.

'खतरोंके खिलाडी' नंतर दिव्यांकाचा पुन्हा एकदा सोज्वळ सूनेचा अवतार; चाहत्यांनी केलं कौतुक

करिष्माचं 2003 साली उद्योजक संजय कपूर याच्याशी लग्न झालं होतं. मात्र त्यांनी 2014 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर अभिषेकने 2007 साली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachhan) सोबत विवाह केला.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Entertainment