मुंबई, 11 जून-तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी असित कुमार मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्यामार्फत सेटवर झालेल्या गैरवर्तनाबद्दल खळबळजनक खुलासा केल्यापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो वादात सापडला आहे. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर आता मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळं वादाचं सत्र काही संपता संपेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. मालिकेच्या सेटवर एका अभिनेत्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक खुलासा मोनिका भदोरियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अयशस्वी; वाढदिवसाच्या आठवडाभर आधीच निधन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांना सोहेल रमानीने सर्वाधिक त्रास दिला आहे. त्याने एकदा सेटवरच्या खुर्च्या सुद्धा फेकून दिल्या होत्या, तो सर्वांशी उद्धटपणे वागतो आणि बहुतांश कलाकारांशी त्याचे भांडण झाले आहे. एवढी भांडणे होऊनही सोहेल अजून प्रोडक्शन हेड आहे, याउलट सर्व कलाकार शो सोडून जात आहेत. एकदा एक अभिनेता मी त्याचे नाव घेणार नाही, तो आपल्या आईला औषध देण्यासाठी गेला होता म्हणून त्याला सेटवर यायला उशीर झाला. तेव्हा सोहेलने आरडाओरडा सुरु केला, तो अतिशय घाणेरडा व्यक्ती आहे पुढे हे भांडण मारहाण करण्यापर्यंत पोहोचले होते, असे देखील तिनं यावेळी सांगितलं.
दिशा वाकानी म्हणजेच दया बेनला सुद्धा अशीच वागणूक मिळाली का? असा प्रश्न केल्यावर मोनिकाने म्हणाली, “कदाचित… तुम्हाला कोणीतरी जास्त मानधन देत आहे आणि पुन्हा मालिकेत ये म्हणून विनंती करत आहे, तर न येण्यामागे याच्याशिवाय दुसरे काय कारण असू शकते?” तसेच असित मोदींबद्दल “ते कलाकारांना नाही तर त्यांच्या टीमला सपोर्ट करतात.” असा दावा मोनिका भदोरियाने केला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या लोकप्रियतेवर या घटनांचा परिणाम होऊ शकतो. मालिकेच्या निर्मात्यांवरील गंभीर आरोपांमुळे त्याच्या ऑपरेटिंग पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालिकेच्या निर्मात्यांकडून कलाकारांना अयोग्य वागणूक दिल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी का, याची चाचपणी केली जात आहे. या प्रकरणात शोला बेकायदेशीर नोटीस देखील जारी केली जाऊ शकते.याचा संपूर्ण परिणाम हा शोवरचं होणार आहे.