मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आई माझी काळूबाई' मालिकेत चक्क तिसऱ्यांदा बदलली 'आर्या', या अभिनेत्रीची लागली वर्णी

'आई माझी काळूबाई' मालिकेत चक्क तिसऱ्यांदा बदलली 'आर्या', या अभिनेत्रीची लागली वर्णी

मालिकांमध्ये मुख्य पात्रचं बदलणं हे काही नवीन नाही.  पण आश्चर्य म्हणजे 'आई माझी काळूबाई' मालिकेतील नायिका बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.

मालिकांमध्ये मुख्य पात्रचं बदलणं हे काही नवीन नाही. पण आश्चर्य म्हणजे 'आई माझी काळूबाई' मालिकेतील नायिका बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.

मालिकांमध्ये मुख्य पात्रचं बदलणं हे काही नवीन नाही. पण आश्चर्य म्हणजे 'आई माझी काळूबाई' मालिकेतील नायिका बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.

मुंबई, 30 मार्च- मालिकांमध्ये मुख्य पात्रच बदलणं हे काही नवीन नाही. अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री बदलून त्या जागी नव्या कलाकारांची वर्णी लागलेली आहे. पण तीन तीन वेळा प्रमुख अभिनेत्री बदलण्याची घटना मराठी मालिकेत (Marathi TV serial) दिसू आली आहे.  मराठी मालिका ‘आई माझी काळूबाई’च्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या मालिकेतील नायिका बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे सर्वच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या निर्मात्या आहेत. या मालिकेच्या सुरुवातीला यातील मुख्य पात्र ’आर्या’ हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं साकारलं होतं. मात्र काही दिवसानंतर अलका कुबल आणि प्राजक्ता मध्ये खटके उडू लागले. त्यांनी एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप सुद्धा केले. आणि शेवटी प्राजक्ताला या मालिकेतून काढण्यात आलं. प्राजक्तानं याआधी प्रसिद्ध मालिका ’स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये ‘येसूबाई’ची भूमिका साकारली होती.

प्राजक्तानंतर या मालिकेमध्ये वर्णी लागली अभिनेत्री वीणा जगतापची. गेली काही महिने वीणा या मालिकेमध्ये ‘आर्या’ ची भूमिका साकारत आहे. मात्र वीणाने सुद्धा या मालिकेला रामराम ठोकल्याची माहिती नुकताच समोर आली आहे. चित्रिकरणादरम्यान वीणा सतत आजारी पडत आहे. तिची तब्येत ठीक नसल्यानं ती मालिका सोडत असल्याचं सांगण्यात येतं आहे. बिग बॉस मराठीमुळे वीणा बरीच चर्चेत आली होती. यामध्ये ती प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिव ठाकरेच्या प्रेमात पडली होती. यादोघांनी कार्यक्रमामध्ये आपलं नातं मान्यसुद्धा केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

वीणा जगताप नंतर आता या मालिकेत वर्णी लागली आहे अभिनेत्री रश्मी अनपट हिची. रश्मी आत्ता मालिकेत ‘आर्या’ हे मुख्य पात्र साकारणार आहे. यापूर्वी रश्मी झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत झळकली होती. रश्मीनं ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. रश्मी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली आहे. तसेच रश्मीने सुवासिनी आणि पुढचा पावली यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका सुद्धा साकारली आहे.तिनं ‘अग्निहोत्र 2’ या मालिकेमध्येसुद्धा अभिनय केला आहे.

(हे वाचा:रावरंभा: मराठी इतिहासातील आणखी एक योद्धा येणार मोठ्या पडद्यावर)

रश्मी ही मूळची पुण्याची आहे. रश्मीनं अमित खेडेकर याच्याशी विवाह केला आहे. रश्मीचं फक्त लग्नच नाही झालं तर ती एका गोंडस बाळाची आईसुद्धा आहे. आत्ता रश्मीला चाहते आर्याच्या भूमिकेत किती दाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials