मुंबई, 20 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे आणि 21 मार्चपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स संबंधित शाळांकडून किंवा जुनिअर कॉलेजेसकडून मिळाले आहेत. हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे विद्यार्थ्यांनी चेक करून घेणं आवश्यक आहे. अनेकदा विद्यार्थी करू नये ती चूक करून बसतात. परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स आणि सूचना देणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. परीक्षेला वेळेत जा परीक्षेच्या किमान २ तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन २ मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा. स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा. त्यानंतर आपली सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जा. किमान १ तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल. MH State Board 12th Exam: पहिलाच पेपर इंग्रजीचा; या ट्रिक्स वापराल तर मिळतील पैकीच्या पैकी मार्क्स हॉल तिकीट तपासून घ्या परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका. तसंच सोबत २-३ पेन . पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्वाच्या सर्व गोष्टी आठवणीनं घ्या. यासाठी वस्तूंची यादी बनवून घ्या आणि ती भिंतीवर लावून ठेवा. यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील. हॉल तिकीट हरवलं तर? अशा वेळी घाबरू नका. लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकारांना याबाबत माहिती द्या. तसंच त्यांना हॉल तिकिटशिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा. मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटाची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवा. जर तुमचं हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना ही झेरोझ दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा. हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. MH State Board 12th Exam: सेंटर्सवर भरारी पथकं ते शेवटी 10 मिनिटांची वाढ; उद्यापासून 12वी बोर्डाची परीक्षा पोहोचण्यास उशीर झाला तर? अनेकदा ट्रॅफिकमुळे किंवा इतर काही कारणांमुळे परीक्षेच्या सेंटरवर पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. मुद्दाम केलं नसेल तरी वेळ पाळली नाही म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका उशिरा मिळते. अशावेळी चिंता करू नका. वर्गातील शिक्षकांना तुमच्या उशिरा येण्याचं कारण नम्रपणे समजवून सांगा. तसंच त्यांना काही वेळ अधिक देण्याची मागणी करा. तुमचं कारण त्यांना पटलं तर महाल काही वेळ मिळू शकतो. पाण्याची बाटली जवळ बाळगा उन्हळ्याच्या दिवसांत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा भरपूर लांबून सेंटरला पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. अशावेळी तुमच्याजवळ स्वतःची पाण्याची बाटली नसल्यास तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसंच परीक्षेत तुमचं लक्ष लागू शकत नाही. म्हणूनच परीक्षेला जाताना नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली जरूर ठेवा MH State Board 12th Exam: उद्यापासून स्टेट बोर्डाची 12वीची परीक्षा; टॉप येण्यासाठी IMP टिप्स वाचाच तुमच्या जागेवर कुठला कागद दिसला तर? परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात. असा कुठला कागद तुमच्या जागेजवळ असला तर त्याला हात लावण्याआधी वर्गातील शिक्षकांना सांगा. असं केल्यामुळे कुठलाही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही. तुम्ही शांतपणे आपला पेपर देऊ शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







