मुंबई, 22 जून: काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी
(CBSE 10th result) आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा
(CBSE Board Exam Results 2022) ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म दोन परीक्षा पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार?
(CBSE Board Exam Results 2022 date) आधी दहावीचा निकाल लागणार की बारावीचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. याच CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सम्पवर येतेय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसईने बोर्ड परीक्षेच्या प्रतींचे मूल्यांकन करण्याचे काम पूर्ण केले आहे, त्यानंतर वेबसाइटवर गुण अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, या माहितीच्या आधारे, सीबीएसई 10वी, 12वी बोर्डाचे निकाल जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या, निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतील.
5 आकडी पगार हवाय? मग, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी 'हा' कोर्स केलाच पाहिजे
दहावीचा निकाल आधी?
जर आपण मागील वर्षाच्या ट्रेंडवर नजर टाकली तर सीबीएसई 10वीचा निकाल आधी जाहीर करत आहे. अशा स्थितीत यंदाही दहावीचा निकाल बोर्डाकडून लवकर जाहीर होऊ शकतो. त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी 12वीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सीबीएसईच्या 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू झाल्या. त्यानंतर 10वीची परीक्षा 24 मे आणि 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत चालली. यावर्षी सीबीएसई 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
बारावी नुकतीच झालीय? 'हा' कोर्स करा अन् लगेच 30,000 रुपये पगार मिळवा : VIDEO
किमान 30 टक्के गुण आवश्यक
26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत झालेल्या CBSE 10वी, 12वी टर्म 2 2022 च्या परीक्षेसाठी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये एकूण 21 लाख विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेला बसले होते, तर 14 लाख विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये इयत्ता 12 ची परीक्षा दिली होती. दहावी, बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 30 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.